शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

गणेशोत्सवानंतर शाळांची घंटा वाजणार, आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून, ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सध्या गणेशोत्सवाची सुट्टी असली तरी १५ सप्टेंबरपासून पुन्हा वर्ग भरणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने कोराेनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली आहे. लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद लाभत असून ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. गतवर्षी दिवाळी सुट्टीनंतर नववी ते बारावी व जानेवारीमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. यावर्षी लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची सूचना केल्याने गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील एकूण ३२०२ शाळांपैकी अवघ्या ६० शाळा सुरू

पालकांमध्ये कोरोनाची भीती अद्याप असल्याने विद्यार्थी उपस्थिती कमी

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

गणेशोत्सव सुट्टीनंतर शाळा सुरू होण्याबाबत निर्णयाची अपेक्षा

अद्याप सूचना नाही

गणेशोत्सवाची सुट्टी अद्याप सुरू आहे. शिक्षक लसीकरण पूर्ण होत आले असले तरी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. शिक्षक दिनापर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यामुळे शासन आदेशाबाबत प्रतीक्षा आहे.

ऑनलाइन अध्यापन

जिल्ह्यातील ३१४२ शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन अद्याप सुरू आहे. त्यासाठी शिक्षक शाळेत जाऊन ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. गूगल मीट, गूगल क्लासरूमच्या माध्यमातून अध्यापन सुरू असून ६० शाळांमध्ये मात्र प्रत्यक्ष अध्यापन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याच्या शासन सूचनेनुसार ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. अन्य शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप शासन निर्णय नाही.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात येत असतानाच शाळा सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. शाळा सुरू करताना लसीकरण नाही तर आरोग्य सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. महाविद्यालयांपूर्वी शाळा सुरू करणे चुकीचे आहे.

- जयेश पवार, पालक