शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

गणेशोत्सवानंतर शाळांची घंटा वाजणार, आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून, ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सध्या गणेशोत्सवाची सुट्टी असली तरी १५ सप्टेंबरपासून पुन्हा वर्ग भरणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने कोराेनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली आहे. लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद लाभत असून ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. गतवर्षी दिवाळी सुट्टीनंतर नववी ते बारावी व जानेवारीमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. यावर्षी लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची सूचना केल्याने गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील एकूण ३२०२ शाळांपैकी अवघ्या ६० शाळा सुरू

पालकांमध्ये कोरोनाची भीती अद्याप असल्याने विद्यार्थी उपस्थिती कमी

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

गणेशोत्सव सुट्टीनंतर शाळा सुरू होण्याबाबत निर्णयाची अपेक्षा

अद्याप सूचना नाही

गणेशोत्सवाची सुट्टी अद्याप सुरू आहे. शिक्षक लसीकरण पूर्ण होत आले असले तरी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. शिक्षक दिनापर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यामुळे शासन आदेशाबाबत प्रतीक्षा आहे.

ऑनलाइन अध्यापन

जिल्ह्यातील ३१४२ शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन अद्याप सुरू आहे. त्यासाठी शिक्षक शाळेत जाऊन ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. गूगल मीट, गूगल क्लासरूमच्या माध्यमातून अध्यापन सुरू असून ६० शाळांमध्ये मात्र प्रत्यक्ष अध्यापन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याच्या शासन सूचनेनुसार ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. अन्य शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप शासन निर्णय नाही.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात येत असतानाच शाळा सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. शाळा सुरू करताना लसीकरण नाही तर आरोग्य सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. महाविद्यालयांपूर्वी शाळा सुरू करणे चुकीचे आहे.

- जयेश पवार, पालक