शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देवरूख आगाराचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:55 IST

चालक व वाहकांचा रिबुक न होण्याचा निर्णय

देवरूख : देवरूख आगारातील चालक व वाहकांनी बुधवारी रिबुक न होण्याचा निर्णय अचानक घेतल्याने आगाराचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. यामुळे अनेक बस फेऱ्या न सुटल्याने प्रवाशांचे हाल झाले.

आगारात वाहकांची तब्बल ६० पदे रिक्त असल्याने प्रतिदिनी ४० ते ४५ वाहकांना रिबुक व्हावे लागते. यामुळे कामाचा अतिरिक्त भार या कर्मचाऱ्यांवर पडतो. यावरून एका कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रकरणावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद धुमसत आहे. यामुळेच हे आंदोलन सुरू झाले आहे.

अचानक रिबुक न होण्याच्या या अनोख्या आंदोलनामुळे अधिकारीवर्ग चक्रावून गेला आहे. अधिकारीवर्गाला याबाबत काहीच कल्पना नसल्याने बसफेऱ्यांचे वेळापत्रक अक्षरश: विस्कळीत झाल्याचे दिसून आले. बुधवारी भरपावसामध्ये शेकडो प्रवासी व विद्यार्थी ताटकळत स्थानकावरच अडकून पडले होेते.

याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याही संघटनेने हे आंदोलन पुकारले नसून, सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रिबुक न होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी करजुवे भागात दोन बसेसचा अपघात झाला होता. हा अपघात कसा घडला व का घडला, याची माहिती न घेताच अधिकारीवर्गाने अपघातातील संबंधीत चालकाला निलंबित केल्याचे आदेश काढल्याने हा रिबुकचा वाद उफाळून आला आहे.

या गाडीला ब्रेक लागत नाहीत, अशी सूचना संबंधीत चालकाने देऊनही तीच गाडी वारंवार दिली जात होती. बसेसचे पुढील टायर रिमोल्ड नसावेत, असा नियम असतानाही देवरूख आगारातील अनेक बसेसचे पुढील टायर रिमोल्डचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेक चालकांनी पत्रकारांसमोर मांडल्या.

अपघातग्रस्त बसचे टायरही रिमोल्ड असल्याने गाडीला ब्रेक लागत नव्हता. म्हणून अपघात झाल्याचे संबंधित चालकाने नमूद केले होते. अपघातातील नुकसानग्रस्त गाडीची भरपाई देत असतानाही या चालकाचे निलंबन केल्यामुळेच आगारातील सर्वच चालक व वाहकांनी रिबुक न होण्याचा निर्णय बुधवारी घेतला. चालकाची बाजू प्रशासनाने विचारात घेणे गरजेचे होते. तसेच यांत्रिक विभागाकडूनही माहिती घेणे आवश्यक होते.

यापैकी कोणत्याही बाबी न करता संबंधित चालकाचा बळी दिला. वारंवार डबल ड्युटी करून अशा प्रकारची वरिष्ठांकडून वागूणक मिळत असेल तर केवळ नियमित सेवाच करण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी चालक व वाहकांनी घेतल्याचे दिसून आले.