शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

टंचाईकृती आराखड्यात८ गावामधील २६ वाड्या

By admin | Updated: February 24, 2016 00:04 IST

राजापूर तालुका : २ लाख २० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित

राजापूर : आगामी काळात भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडून राजापूरचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये ८ गावांसह २६ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी २ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या गावांमध्ये ताम्हाणे गावातील चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, मोरोशीमधील तळेवाडी, मिरासवाडी, टेंबवाडी, गावकरवाडी, खरवतेतील धनगरवाडी, हसोळतर्फ सौंदळमधील कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, कारवलीतील विठ्ठलवाडी, गाववाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी, वरचीवाडी, दसवंतवाडी, झर्येतील पळसमकरवाडी, धनगरवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी, तळवडेतील बामणदेव धनगरवाडी, साखरीनाटेतील बलबले मोहल्ला यांचा समावेश आहे. या गावांसह अंतर्गत वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे, त्यासाठी २ लाख २० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेंतर्गत निवड झालेली पाच गावे व त्यामधील १८ वाड्या यांचादेखील संभाव्य पाणीटंचाईमध्ये समावेश करण्यात आल्याने जलशिवार योजनेतून जी कामे मार्गी लागली, असा जो डंका पिटला गेला, त्यालाच तडा गेला असल्याचे आता समोर आले आहे. भरमसाठ खर्च करूनही जलशिवारयुक्त योजनेची कोणती कामे मार्गी लागली, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत, तर जी गावे व वाड्या संभाव्य टंचाईत समावेश करण्यात आल्या आहेत. नेमके त्याच गावात किंवा त्या लगतच्या गावातच धरण प्रकल्प आहेत. ही बाबदेखील दुर्लक्षून चालणारी नाही. त्यामुळेच मागील एक दशकाच्या कालखंडात नेमकी हीच गावे व त्यामधील वाड्यांना दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, हेच वास्तव पुढे आले. (प्रतिनिधी) योजनेबाबत साशंकता : जलशिवार योजनेतील गावांचाही समावेश जिल्हा परिषदेकडून जलशिवार योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेतील गावांचा संभाव्य पाणीटंचाईत समावेश करण्यात आल्याने योजनेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.