शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

‘त्या’ पाच गावात अजूनही टंचाई

By admin | Updated: May 20, 2016 00:43 IST

राजापूर तालुका : दीड कोटींचा खर्च होऊनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

राजापूर : तालुक्यातील ५ गावांमध्ये सुमारे १ कोटी ५१ लाख रुपये खर्चाची ८५ कामे जलयुक्त शिवार योजनेतून झाली असल्याचे कृषी अधिकारी सांगत असतानाच दुसरीकडे त्या गावांमधील पाणीटंचाई कायम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. याबाबत संतप्त सदस्यांनी विविध सवाल उपस्थित करत संबंधित कृ षी विभागावर प्रश्नांची सरबत्ती केली.या मासिक सभेला अनेक खात्यांचे प्रमुख अनुपस्थितीत होते. तर काही अधिकारी विलंबाने सभागृहात दाखल झाले. याबाबत उपस्थित सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे मासिक बैठकीला अनुपस्थित रहाणाऱ्या व विलंबाने सभागृहात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपसभापती उमेश पराडकर यांनी यावेळी दिला.या मासिक सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कामाच्या आराखड्यावरुन अधिकारी वर्गातच एकवाक्यता नसल्याचे यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आले. शासनाच्या शेष फंडातून ११ लाखांची तरतूद होऊनदेखील अद्याप पाणी व्यवस्थेशी संबंधित कामे मार्गी लागलेली नसल्याची माहिती सदस्यांनी देत तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात अनेक नळपाणी योजना या अद्याप सुरुच झाल्या नसल्याची माहिती सदस्यांनी यावेळी दिली. अशा सर्व नळपाणी योजनांची तत्काळ चौकशी करा व दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दीपक नागले व शिवाजी रबसे यांनी केली.३० एप्रिलनंतर सर्व शिक्षकांच्या कामगिऱ्या रद्द केल्या गेल्या असून, जर जास्त पटसंख्या व कमी शिक्षक एखाद्या शाळेत असेल तरच कामगिरीवर काढले जाईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तर २० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या तालुक्यातील १७६ शाळांबाबतची माहिती शासनाला देण्यात आली असून, याबाबत अद्याप शासनाकडून कारवाई झालेली नाही, अशीही माहिती देण्यात आली. विद्यार्थी पटसंख्येवरुन वाद निर्माण करणाऱ्या जैतापूर - आगरवाडी व वाडाभराडे येथील मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले. कशेळी शाळा नं. ५ ला इयत्ता ७ वीचा वर्ग जोडण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.तालुक्यातील काही अंगणवाड्यांना अद्यापही विद्युत पुरवठा न दिल्याने या अंगणवाड्या बंद असल्याची माहिती मासिक सभेत पुढे आली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात पाच गावे निवडण्यात आली असून, त्यामध्ये ८५ कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये खरवते, झर्ये, ताम्हाणे, मोरोशी व कारवली या गावांमध्ये ही कामे झाली असून, त्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये खर्च झाला असल्याची माहिती कृ षी अधिकारी चंद्रामणी मेश्राम यांनी दिली तर दुसऱ्या टप्प्यात या योजनेंतर्गत तालुक्यात करक, तळवडे व जवळेथर या तीन गावांची निवड झाली आहे. त्यातील तळवडे व करक या गावात धरण प्रकल्प आहेत, मग ती गावे जलयुक्त शिवार योजनेत कशी? असे सवाल उपस्थित सदस्यांनी केला. पण त्यावर समर्पक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे राजापूर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (प्रतिनिधी)