शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

टंचाई कृती आराखडा दीड कोटीने घटला

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

पाणीपुरवठा : बंधाऱ्यांवर भिस्त, योजना दुरुस्तीकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात यंदा १ कोटी ४0 लाखांची घट झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याचा ३५ लाख ९० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्यात नादुरूस्त योजनांच्या दुरूस्तीचा समावेशच करण्यात आलेला नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात १५८ गावातील २९९ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी २८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यात केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.या आराखड्यानुसार नवीन विंधन विहिरी, विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे व नळपाणी योजना दुरुस्तीवर यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. सन २०१४-१५चा १ कोटी ७६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा १९० गावांतील ४१८ वाड्यांचा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आली होती. प्रत्यक्ष टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, टंचाईच्या कालावधीत टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४९ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, यंदा पाणीटंचाईचा आराखडा ३५ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आला असून, तो गतवर्षीपेक्षा १ कोटी ४० लाख रुपयांनी कमी आहे. कारण यंदाच्या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. तसेच यंदा संभाव्य टंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. कारण गेल्या तीन महिन्यामध्ये सुमारे ४५०० वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई घटण्याची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)बंधारे परिणामकारक : ग्रामीण भागात पाणी पातळीत वाढजिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी बंधारे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५०० बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रपणे बसणार नसल्याचे दिसत आहे.तालुकागावेवाड्यामंडणगड३४दापोली२८४३खेड२५४३गुहागर११४०चिपळूण२५४९संगमेश्वर२८३४रत्नागिरी१७३५लांजा ९१६राजापूर१२३५एकूण१५८२९९