शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई कृती आराखडा दीड कोटीने घटला

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

पाणीपुरवठा : बंधाऱ्यांवर भिस्त, योजना दुरुस्तीकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात यंदा १ कोटी ४0 लाखांची घट झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याचा ३५ लाख ९० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्यात नादुरूस्त योजनांच्या दुरूस्तीचा समावेशच करण्यात आलेला नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात १५८ गावातील २९९ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी २८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यात केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.या आराखड्यानुसार नवीन विंधन विहिरी, विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे व नळपाणी योजना दुरुस्तीवर यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. सन २०१४-१५चा १ कोटी ७६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा १९० गावांतील ४१८ वाड्यांचा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आली होती. प्रत्यक्ष टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, टंचाईच्या कालावधीत टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४९ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, यंदा पाणीटंचाईचा आराखडा ३५ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आला असून, तो गतवर्षीपेक्षा १ कोटी ४० लाख रुपयांनी कमी आहे. कारण यंदाच्या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. तसेच यंदा संभाव्य टंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. कारण गेल्या तीन महिन्यामध्ये सुमारे ४५०० वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई घटण्याची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)बंधारे परिणामकारक : ग्रामीण भागात पाणी पातळीत वाढजिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी बंधारे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५०० बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रपणे बसणार नसल्याचे दिसत आहे.तालुकागावेवाड्यामंडणगड३४दापोली२८४३खेड२५४३गुहागर११४०चिपळूण२५४९संगमेश्वर२८३४रत्नागिरी१७३५लांजा ९१६राजापूर१२३५एकूण१५८२९९