शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

टंचाई कृती आराखडा दीड कोटीने घटला

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

पाणीपुरवठा : बंधाऱ्यांवर भिस्त, योजना दुरुस्तीकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात यंदा १ कोटी ४0 लाखांची घट झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याचा ३५ लाख ९० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्यात नादुरूस्त योजनांच्या दुरूस्तीचा समावेशच करण्यात आलेला नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात १५८ गावातील २९९ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी २८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यात केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.या आराखड्यानुसार नवीन विंधन विहिरी, विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे व नळपाणी योजना दुरुस्तीवर यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. सन २०१४-१५चा १ कोटी ७६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा १९० गावांतील ४१८ वाड्यांचा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आली होती. प्रत्यक्ष टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, टंचाईच्या कालावधीत टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४९ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, यंदा पाणीटंचाईचा आराखडा ३५ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आला असून, तो गतवर्षीपेक्षा १ कोटी ४० लाख रुपयांनी कमी आहे. कारण यंदाच्या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. तसेच यंदा संभाव्य टंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. कारण गेल्या तीन महिन्यामध्ये सुमारे ४५०० वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई घटण्याची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)बंधारे परिणामकारक : ग्रामीण भागात पाणी पातळीत वाढजिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी बंधारे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५०० बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रपणे बसणार नसल्याचे दिसत आहे.तालुकागावेवाड्यामंडणगड३४दापोली२८४३खेड२५४३गुहागर११४०चिपळूण२५४९संगमेश्वर२८३४रत्नागिरी१७३५लांजा ९१६राजापूर१२३५एकूण१५८२९९