शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सव्वाकोटींचे नुकसान

By admin | Updated: August 13, 2014 23:29 IST

आपत्तीमुळे पाचजणांचा मृत्यू : मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीची मदत

रत्नागिरी : जिल्ह्यात वादळी पावसाने गेल्या दोन महिन्यांत ३८७ घरांची पडझड झाली असून, त्यात एकूण ५८ लाखा २९ हजार ९१७ रूपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे एकूण ६४ लाख २ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. या पावसात मृत झालेल्यांची संख्या ५ असून, ६ जनावरांचा बळी गेला आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख ५४ हजार २०३ रूपयांच्या नुकसानाची नोंद आहे. यातील मृतांपैकी जणांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली. यावर्षी जूनमध्ये पाऊस गायब झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार वृष्टी करून जिल्ह्यातील अनेक घरे, गोठे, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात १० घरांचे आणि ११ गोठ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर ३४० घरांची आणि ३३ गोठ्यांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ३९४ असून, यापैकी फक्त २० घरे व गोठे यांना मदत दिलेली आहे. उर्वरित घरे आणि गोठे यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या सर्वांचे एकूण नुकसान ५८ लाख ४५ हजार ४३२ रूपये इतके झाले आहे.जिल्ह्यातील २४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ४ लाख ६६ हजार ७५, तर खासगी ४३ मालमत्तेचे ५९ लाख ३६ हजार २११ रूपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही मालमत्तांचे एकूण ६४ लाख ०२ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे.याशिवाय पुरात, वीज पडून, दरड भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेपाच लाख रूपये जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली आहे. याच काळात आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तो नैसर्गिक आपत्तीने झाला नसल्याचे सांगत त्यांना मदत देण्यात आलेली नाही. तसेच या पावसात ६ जनावरांचा बळी गेला असून, एकूण १ लाख ३९ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या मालकांना नुकसानीची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, पंचनामे वेळेवर न झाल्याने पडझड झालेल्या घरांची नुकसानभरपाई मिळण्यात अडचण येत आहे. (प्रतिनिधी)