शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

सावरकर साहित्य संमेलन २९पासून

By admin | Updated: December 24, 2015 23:53 IST

दीपक पटवर्धन : रत्नागिरीतील कार्य प्रभावीपणे जनतेसमोर येण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार परत अधोरेखित होऊन समाजासमोर यावेत, विशेषत: युवा पिढीवर त्याची मोहिनी पडावी, रत्नागिरीत त्यांनी केलेले कार्य प्रभावीपणे जनतेसमोर यावे, या उद्देशाने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने पुढाकार घेतला आहे. येत्या २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन रत्नागिरीत होणार असल्याची माहिती नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.हे साहित्य संमेलन मुंबईतील स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान तसेच जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. गतवर्षी हे साहित्य संमेलन हैद्राबाद येथे तर त्याआधी नाशिक येथे झाले होते. रत्नागिरीतील होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २९ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन भिकू (दादा) इदाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनापूर्वी सकाळी आयोजित केलेली ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. यात समाजातील सर्व घटकांचा, संघटनांचा सहभाग अपेक्षित आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक आदी विविध विषय हाताळले जाणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकाही प्रसिद्ध होणार आहे. विविध संस्था, सामाजिक काम करणारे घटक यांना बरोबर घेऊन दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रमुख उ्ददेश या संमेलनामागे असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. हे तीन दिवसीय साहित्य संमेलन नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. दि. ३० व ३१ जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीत सावरकरांच्या विचार आणि कार्यावर आधारित अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये अ‍ॅड. किशोर जावळे, डॉ. श्रीरंग गोडबोले, धनश्री लेले, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. अशोक मोडक, व्ही. एम. पाटील, प्रा. रमेश सोनवडकर, सच्चिदानंद शेवडे, प्रा. दत्ता नाईक, दुर्गेश परूळेकर, समीर दरेकर, अश्विनी मयेकर आदी मान्यवरांचा सहभाग असणार आहे. दि. ३० रोजी रात्री सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा अतिशय दर्जेदार असा गाजलेला ‘अनादी मी...अवध्य मी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. ३१ रोजी दुपारी १२.३० वाजता संमेलनाची सांगता प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्या महाराष्ट्रातील सावरकरप्रेमींची संख्या लक्षात घेऊन रत्नागिरीतील विविध स्थळे आणि सावरकरांचे वास्तव्य असलेल्या वास्तू पाहण्याच्या दृष्टीने वेगळे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही अ‍ॅड. पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत चंद्रशेखर पटवर्धन उपस्थित होते. (प्रतिनिधी)संमेलनादरम्यान सिंधुदुर्गचे साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘कवी, नाटककार सावरकर’ या पुस्तकाचेही प्रकाशन होणार असल्याचे दीपक पटवर्धन यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीरांच्या जीवनपटाबरोबरच विविध विषयांचा ऊहापोह.२९ रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन.तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल.