शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सौरभची शिमगाेत्सवातील गावची भेट शेवटची, किरकोळ वादातून पुण्यात झाला खून

By संदीप बांद्रे | Updated: March 22, 2023 18:46 IST

त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील वालाेपे- मयेकरवाडी येथील साैरभ मयेकर हा पुणे येथे एका कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होता. शिमगाेत्सवाला ताे आपल्या गावी आला हाेता. मागील आठवड्यात ताे पुण्यात निघून गेला हाेता. मात्र, त्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर येताच कुटुंबीयांना धक्काच बसला. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या साैरभची ती शेवटची गाव भेट ठरली.तालुक्यातील वालोपे येथील तरुणाचा पुण्यात खून झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. सौरभ तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त वास्तव्याला होता. सोमवारी रात्री किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी सौरभचे अपहरण केले. तसेच त्याला सातेगावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (१८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन अल्पवयीन आरोपींमधील एकजण जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे. सौरभचे माध्यमिक शिक्षण पेढे येथे झाले होते. पुढे त्याने रिगल महाविद्यालयात आयटीआयचे शिक्षण घेतले. मात्र, त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. शेतीच्या कामात रमणारा सौरभसौरभला शेतीच्या कामाची प्रचंड आवड होती. शेतात पॉवर ट्रिलर चालवण्यात त्याचा हातखंडा होता. शिक्षण सुरू असताना तो नांगरणीची कामे करीत असे. या कामासाठी तो वालोपे पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र, नोकरीनिमित्ताने त्याला अचानक पुण्यात जावे लागले. इलेक्ट्रिशियनच्या कामात तो रमला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी