शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सौरभची शिमगाेत्सवातील गावची भेट शेवटची, किरकोळ वादातून पुण्यात झाला खून

By संदीप बांद्रे | Updated: March 22, 2023 18:46 IST

त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील वालाेपे- मयेकरवाडी येथील साैरभ मयेकर हा पुणे येथे एका कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होता. शिमगाेत्सवाला ताे आपल्या गावी आला हाेता. मागील आठवड्यात ताे पुण्यात निघून गेला हाेता. मात्र, त्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर येताच कुटुंबीयांना धक्काच बसला. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या साैरभची ती शेवटची गाव भेट ठरली.तालुक्यातील वालोपे येथील तरुणाचा पुण्यात खून झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. सौरभ तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त वास्तव्याला होता. सोमवारी रात्री किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी सौरभचे अपहरण केले. तसेच त्याला सातेगावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (१८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन अल्पवयीन आरोपींमधील एकजण जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे. सौरभचे माध्यमिक शिक्षण पेढे येथे झाले होते. पुढे त्याने रिगल महाविद्यालयात आयटीआयचे शिक्षण घेतले. मात्र, त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. शेतीच्या कामात रमणारा सौरभसौरभला शेतीच्या कामाची प्रचंड आवड होती. शेतात पॉवर ट्रिलर चालवण्यात त्याचा हातखंडा होता. शिक्षण सुरू असताना तो नांगरणीची कामे करीत असे. या कामासाठी तो वालोपे पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र, नोकरीनिमित्ताने त्याला अचानक पुण्यात जावे लागले. इलेक्ट्रिशियनच्या कामात तो रमला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी