शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

संगमेश्वर पोलीस ढिम्मच!

By admin | Updated: February 2, 2016 23:33 IST

बालिकेचा खून : आरोपी गजाआड, दोन दिवसांनंतरही कारण गुलदस्त्यातच

देवरुख : घरानजीक खेळत असलेल्या मुलींना वानर आलाय, असे सांगून आपल्या घराकडे बोलावून त्यातील साक्षी नथुराम भायजे (७) या बालिकेचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर धनावडे वाडीतील या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी राघो भानू धनावडे (५५) या वृद्धाची चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. निष्पाप बालिकेच्या निर्घृण खून प्रकरणाचा संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत. मात्र, आरोपीने कशासाठी खून केला, नेमके कारण काय? याची उकल अद्याप होऊ शकलेली नसल्याने खुनाचे गूढ कायम आहे. आरोपी राघो धनावडे याने कोयतीने वार करुन निष्पाप बालिका साक्षीला ठार मारल्याची कबुली पोलिसांजवळ दिल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, आरोपी संभ्रमात टाकणारी वेगवेगळी विधाने करीत असल्याचेही संगमेश्वर पोलिसांकडून सांगण्यात येते. आरोपी साक्षीला कोयत्याने मारल्याचे सांगतो. मात्र, पुरले किंवा पुढे काय केले, याबाबत स्पष्ट काहीच बोलत नाही. तसेच तो म्हणतो की, वानराने तिला नेले, असेही तो बोलत आहे, अशा संदिग्ध विधानांमुळे नेमके कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही. दरम्यान, मंगळवारी पुन्हा संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक मनोहर चिखले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन खुनाबाबत काही धागेदोरे हाती येतात का? याबाबत प्रयत्न करीत आहेत. मात्र दोन दिवसानंतरही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. गावामध्ये या घटनेमुळे तणावाचे वातावरण होते. त्यामुळे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. साक्षीवर सोमवारी ११.३०च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी वाडीतील ग्रामस्थ स्थानिक आणि मुंबईकर यांची बैठकदेखील पार पडली. सोमवारी घटनास्थळी रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, साक्षी या ७ वर्षीय बालिकेचे कुटुंबीय अजूनही धास्तावलेलेच असून, तिच्या बहिणी अजून दु:खातून सावरलेल्या नाहीत. (प्रतिनिधी) वरिष्ठांची नजर : आरोपीसह पोलीस धामापुरात पळून गेलेला आरोपी पोलिसांनी काही क्षणातच अटक केला. मात्र, त्याच्याकडून गुन्ह्याचे कारण वदवून घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी संगमेश्वर तालुक्यात नजर ठेवून आहेत. असे असताना पोलिसांना अजूनही आरोपीकडून खुनाचे कारण शोधून काढता आलेले नाही. आरोपीला अटक केल्यास दोन दिवस उलटून गेले आहेत. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला पुन्हा धामापूर गावात नेले. मात्र, तेथेही काही हाती लागले नसल्याचे समजते. वेगवेगळी माहिती पोलिसांनी आरोपीकडून खुनाचे कारण वदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी राघो हा प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसानंतरही पोलिसांची तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही.