शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर पोलीस ढिम्मच!

By admin | Updated: February 2, 2016 23:33 IST

बालिकेचा खून : आरोपी गजाआड, दोन दिवसांनंतरही कारण गुलदस्त्यातच

देवरुख : घरानजीक खेळत असलेल्या मुलींना वानर आलाय, असे सांगून आपल्या घराकडे बोलावून त्यातील साक्षी नथुराम भायजे (७) या बालिकेचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर धनावडे वाडीतील या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी राघो भानू धनावडे (५५) या वृद्धाची चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. निष्पाप बालिकेच्या निर्घृण खून प्रकरणाचा संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत. मात्र, आरोपीने कशासाठी खून केला, नेमके कारण काय? याची उकल अद्याप होऊ शकलेली नसल्याने खुनाचे गूढ कायम आहे. आरोपी राघो धनावडे याने कोयतीने वार करुन निष्पाप बालिका साक्षीला ठार मारल्याची कबुली पोलिसांजवळ दिल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, आरोपी संभ्रमात टाकणारी वेगवेगळी विधाने करीत असल्याचेही संगमेश्वर पोलिसांकडून सांगण्यात येते. आरोपी साक्षीला कोयत्याने मारल्याचे सांगतो. मात्र, पुरले किंवा पुढे काय केले, याबाबत स्पष्ट काहीच बोलत नाही. तसेच तो म्हणतो की, वानराने तिला नेले, असेही तो बोलत आहे, अशा संदिग्ध विधानांमुळे नेमके कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही. दरम्यान, मंगळवारी पुन्हा संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक मनोहर चिखले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन खुनाबाबत काही धागेदोरे हाती येतात का? याबाबत प्रयत्न करीत आहेत. मात्र दोन दिवसानंतरही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. गावामध्ये या घटनेमुळे तणावाचे वातावरण होते. त्यामुळे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. साक्षीवर सोमवारी ११.३०च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी वाडीतील ग्रामस्थ स्थानिक आणि मुंबईकर यांची बैठकदेखील पार पडली. सोमवारी घटनास्थळी रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, साक्षी या ७ वर्षीय बालिकेचे कुटुंबीय अजूनही धास्तावलेलेच असून, तिच्या बहिणी अजून दु:खातून सावरलेल्या नाहीत. (प्रतिनिधी) वरिष्ठांची नजर : आरोपीसह पोलीस धामापुरात पळून गेलेला आरोपी पोलिसांनी काही क्षणातच अटक केला. मात्र, त्याच्याकडून गुन्ह्याचे कारण वदवून घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी संगमेश्वर तालुक्यात नजर ठेवून आहेत. असे असताना पोलिसांना अजूनही आरोपीकडून खुनाचे कारण शोधून काढता आलेले नाही. आरोपीला अटक केल्यास दोन दिवस उलटून गेले आहेत. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला पुन्हा धामापूर गावात नेले. मात्र, तेथेही काही हाती लागले नसल्याचे समजते. वेगवेगळी माहिती पोलिसांनी आरोपीकडून खुनाचे कारण वदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी राघो हा प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसानंतरही पोलिसांची तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही.