शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

जिल्ह्यातील चार खाड्यांमधील हातपाठी उत्खननासाठी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 10:22 IST

sand, ratnagiri, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने रत्नागिरी जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार खाड्यांमधील हातपाठी उत्खननासाठी मंजुरीदरनिश्चितीसाठी शासनाकडे प्रस्ताव

रत्नागिरी : महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.कोकणात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असतो. त्यामुळे खनिकर्म विभागाचे ऑक्टोबर र ते सप्टेंबर असे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. पुर्वी वाळू उत्खननासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी दिली जात असे. मात्र, आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार मेरीटाईम बोर्ड खाड्यांचे सर्वेक्षण करून वाळू उत्खननाची जागा निश्चित करून परवानगी देते.यानुसार आता जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील ३ गट आणि दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यांमधील प्रत्येकी एक अशा एकूण सहा गटातील ६,२९,३५७ ब्रास वाळूसाठी मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात आली आहे. या वाळूच्या उत्खननासाठी आता दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून दर निश्चिती झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठीही मेरी टाईम बोर्डाकडून सर्वेक्षण झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी ना हरकत परवाने देण्यात येणार आहेत.गेल्यावर्षी लिलावातील दर अधिक प्रमाणावर असल्याने सातत्याने लिलाव करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाळूचा लिलाव होऊ शकले नाहीत. सध्या बांधकाम क्षेत्राला आलेली गती लक्षात घेता वाळूचा तुटवडा अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे वाळू उत्खननानंतर त्याच्या लिलावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.जिल्हा खनिकर्म विभागाकडून हातपाटी वाळू उत्खननासाठी शासनाकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतर उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाळू व्यावसायिकांचे शासनाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.खाडी वाळू (ब्रास)

  • आंजर्ले खाडी (३ गट) २,५०,३९८
  • दाभोळ (१ गट) १,९२,८७७
  • जयगड (१ गट) ४०,०५८
  • काळबादेवी (१ गट) १,४६,०२४

एकूण (६ गट) ६,२९,३५७

टॅग्स :sandवाळूRatnagiriरत्नागिरी