शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

सण आयलाय गाे नारली पुनवेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. ...

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. बंदी कालावधी संपला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नाैका समुद्रात गेलेल्या नाहीत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पाैर्णिमेला सागराची पूजा केली जाणार असून, नारळ अर्पण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही मच्छीमार बांधव जाेपासत आहेत.

मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेला बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात, बोटींची पूजा करतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजतगाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका रंगतात. समुद्राला शांत करण्यासाठी नारळाला सोनेरी कागद लावून सजवलेला नारळ समुद्राला अर्पण केला जाताे. त्यानंतर सागराला विनवणी करून यावर्षी जाळ्यात चांगली मासळी मिळू दे, अशी प्रार्थना केली जाते.

जिल्ह्यात साडेतीन हजार मासेमारी नौका असून, सोमवारपासून या नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार आहेत. समुद्रकिनारपट्टीच्या वस्तीतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मच्छीमार समाज नारळ अर्पण करताेच शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस स्थानक, सीमा शुल्क विभागाकडून तसेच नागरिकांकडूनही नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते.

-------------------

मच्छिमारांची सागरदेवावरच मदार

मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह मासेवारीवर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भरसमुद्रात मासेमारीला जात असतो. त्यामुळे या समाजाची मदार सागरदेवावर अवलंबून असल्यानेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमनिमित्त खास गोड पदार्थांचा नैवद्य बोटीला व समुद्राला अर्पण केला जातो. समुद्राची यथासांग पूजा करताना, ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या मालकाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासळी लाभूू दे...’ असे गाऱ्हाणे समुद्राला घातले जाते.

-----------------------

अनेक ठिकाणी रंगतात स्पर्धा

प्रत्येक गावात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याच्या काही वेगळ्या परंपराही आहेत. काही ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळफोडीचा खेळ रंगताे. हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची स्पर्धा भरवली जाते. नारळ फाेडणाऱ्याला बक्षीस म्हणून नारळच दिला जातो. काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉल मारून नारळ फोडण्याची स्पर्धा रंगते. स्पर्धकापासून सात-आठ फुटांवर नारळ ठेवला जातो. बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचून मारून फोडण्याचे कौशल्य अजमावले जाते. फोडलेला नारळ बक्षीस म्हणून स्पर्धकाला दिला जातो.

- मेहरून नाकाडे