शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सण आयलाय गाे नारली पुनवेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. ...

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. बंदी कालावधी संपला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नाैका समुद्रात गेलेल्या नाहीत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पाैर्णिमेला सागराची पूजा केली जाणार असून, नारळ अर्पण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही मच्छीमार बांधव जाेपासत आहेत.

मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेला बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात, बोटींची पूजा करतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजतगाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका रंगतात. समुद्राला शांत करण्यासाठी नारळाला सोनेरी कागद लावून सजवलेला नारळ समुद्राला अर्पण केला जाताे. त्यानंतर सागराला विनवणी करून यावर्षी जाळ्यात चांगली मासळी मिळू दे, अशी प्रार्थना केली जाते.

जिल्ह्यात साडेतीन हजार मासेमारी नौका असून, सोमवारपासून या नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार आहेत. समुद्रकिनारपट्टीच्या वस्तीतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मच्छीमार समाज नारळ अर्पण करताेच शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस स्थानक, सीमा शुल्क विभागाकडून तसेच नागरिकांकडूनही नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते.

-------------------

मच्छिमारांची सागरदेवावरच मदार

मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह मासेवारीवर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भरसमुद्रात मासेमारीला जात असतो. त्यामुळे या समाजाची मदार सागरदेवावर अवलंबून असल्यानेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमनिमित्त खास गोड पदार्थांचा नैवद्य बोटीला व समुद्राला अर्पण केला जातो. समुद्राची यथासांग पूजा करताना, ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या मालकाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासळी लाभूू दे...’ असे गाऱ्हाणे समुद्राला घातले जाते.

-----------------------

अनेक ठिकाणी रंगतात स्पर्धा

प्रत्येक गावात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याच्या काही वेगळ्या परंपराही आहेत. काही ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळफोडीचा खेळ रंगताे. हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची स्पर्धा भरवली जाते. नारळ फाेडणाऱ्याला बक्षीस म्हणून नारळच दिला जातो. काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉल मारून नारळ फोडण्याची स्पर्धा रंगते. स्पर्धकापासून सात-आठ फुटांवर नारळ ठेवला जातो. बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचून मारून फोडण्याचे कौशल्य अजमावले जाते. फोडलेला नारळ बक्षीस म्हणून स्पर्धकाला दिला जातो.

- मेहरून नाकाडे