शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, ...

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात ही सर्व दुकाने ११ वाजता बंद झाल्यानंतर रस्त्यांवर सामसूम पसरलेली असते. ठरावीक वाहनेच सुरू असतात.

डोर्लेत काजू लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जलद गतीने राबविण्यात येत होती. तालुक्यातील डोर्ले गावातही या योजनेचा लाभ घेऊन ७.२९ हेक्टर क्षेत्रावर आंबा काजू लागवड यशस्वी राबविण्यात आली असून, मजुरीपोटी दोन लाख रुपयांचे वितरण झाले आहे.

निराधार महिलांना वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्येचे उपसरपंच, तसेच काँग्रेस जिल्हा युवा उपाध्यक्ष संजू लोटणकर यांनी गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधनाचे वाटप केले. राज्य शासनाकडून उपसरपंचांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम लोटणकर यांनी या महिलांना दिली आहे. लाभार्थींनी लोटणकर यांना धन्यवाद दिले.

आंजर्लेत लसीकरण केंद्र

दापोली : दापोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी आंजर्ले येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता हे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईकरांचा धसका

लांजा : शिमगोत्सवात गावाला आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे स्पॉट असल्याने पुन्हा मुुंबईकर चाकरमानी गावाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच पुन्हा मुंबईकर गावी आले तर या भीतीने तालुकावासीय धास्तावले आहेत.

कामगारांवर संकट

राजापूर : सध्या शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत सार्वजनिक बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य बांधकामे बंद आहेत. या बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबल्याने पुन्हा या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

कमाल तापमानात वाढ

रत्नागिरी : सध्या मळभी वातावरण कमी झाले असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुन्हा काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांचा त्रास सोसावा लागणार आहे.