शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, ...

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात ही सर्व दुकाने ११ वाजता बंद झाल्यानंतर रस्त्यांवर सामसूम पसरलेली असते. ठरावीक वाहनेच सुरू असतात.

डोर्लेत काजू लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जलद गतीने राबविण्यात येत होती. तालुक्यातील डोर्ले गावातही या योजनेचा लाभ घेऊन ७.२९ हेक्टर क्षेत्रावर आंबा काजू लागवड यशस्वी राबविण्यात आली असून, मजुरीपोटी दोन लाख रुपयांचे वितरण झाले आहे.

निराधार महिलांना वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्येचे उपसरपंच, तसेच काँग्रेस जिल्हा युवा उपाध्यक्ष संजू लोटणकर यांनी गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधनाचे वाटप केले. राज्य शासनाकडून उपसरपंचांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम लोटणकर यांनी या महिलांना दिली आहे. लाभार्थींनी लोटणकर यांना धन्यवाद दिले.

आंजर्लेत लसीकरण केंद्र

दापोली : दापोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी आंजर्ले येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता हे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईकरांचा धसका

लांजा : शिमगोत्सवात गावाला आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे स्पॉट असल्याने पुन्हा मुुंबईकर चाकरमानी गावाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच पुन्हा मुंबईकर गावी आले तर या भीतीने तालुकावासीय धास्तावले आहेत.

कामगारांवर संकट

राजापूर : सध्या शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत सार्वजनिक बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य बांधकामे बंद आहेत. या बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबल्याने पुन्हा या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

कमाल तापमानात वाढ

रत्नागिरी : सध्या मळभी वातावरण कमी झाले असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुन्हा काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांचा त्रास सोसावा लागणार आहे.