शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. यंदा घाट्यात?

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

परिवहन महामंडळ : जीवनवाहिनीला गणराय नाही पावला...!

रत्नागिरी : गणेशोत्सवाकरिता गावाला आलेल्या मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. गणेशोत्सवासाठी एकूण २००५ जादा गाड्यातून मुंबईकर गावी आले होते. मात्र, आतापर्यंत १३०० जादा गाड्यांव्दारे मुंबईकर मुंबईला रवाना झाले आहेत. गतवर्षी १४३० जादा गाड्या मुंबईला गेल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १३० गाड्या घटल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, याकरिता २०१३ मध्ये १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी अर्थात् २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजाराचे उत्पन्न लाभले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी एस. टी.ला मिळालेला प्रतिसाद अल्प आहे.कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईकर गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी परततो. ग्रामीण भागात वाडीवस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी एस. टी. सोयीस्कर ठरत असल्यामुळे प्रवाशांचा एस. टी.कडे असलेला कल अधिक आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून २००५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एस. टी. महामंडळाने एका गावातील लोकांसाठी ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जादा गाड्यांव्यतिरिक्त दररोज १०० गाड्या विभागातून मुंबईला रवाना होत आहेत.गौरी गणपती पूजनापासूनच जादा गाड्यांची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली होती. गतवर्षी १४३० जादा गाड्यांनी मुंबईकर रवाना झाले होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिक गाड्या मुंबईला रवाना होतील, असा विश्वास एस. टी.च्या पदाधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र, तो फोल ठरला आहे.गेल्या दोन वर्षी ऐन गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. यावर्षी पाऊसच नसल्यामुळे रेल्वे सुविधा सुरळीत सुरू होती. इतकेच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी खास जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवासीवर्ग रेल्वेकडे आकर्षिला गेला. त्यामुळे यावर्षी एस. टी.ला १३० जादा गाड्यांची तूट आल्याने उत्पन्न घटले आहे. (प्रतिनिधी)रेल्वेकडे लोकांचा वाढता कलप्रतिवर्षी एस. टी.ला गणेशोत्सवात एस. टी.ला मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, यंदा अनेक गणेशभक्तांनी रेल्वेची पाऊलवाट पकडली. रेल्वेनेही पुरेशी आणि चांगली सोय केल्याने अनेकांचा प्रवास गर्दीचा झाला असला तरीही सुखकर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली. दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी यंदा त्यामानाने कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेत घरी पोहोचता आले.