शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

एस. टी. यंदा घाट्यात?

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

परिवहन महामंडळ : जीवनवाहिनीला गणराय नाही पावला...!

रत्नागिरी : गणेशोत्सवाकरिता गावाला आलेल्या मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. गणेशोत्सवासाठी एकूण २००५ जादा गाड्यातून मुंबईकर गावी आले होते. मात्र, आतापर्यंत १३०० जादा गाड्यांव्दारे मुंबईकर मुंबईला रवाना झाले आहेत. गतवर्षी १४३० जादा गाड्या मुंबईला गेल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १३० गाड्या घटल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, याकरिता २०१३ मध्ये १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी अर्थात् २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजाराचे उत्पन्न लाभले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी एस. टी.ला मिळालेला प्रतिसाद अल्प आहे.कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईकर गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी परततो. ग्रामीण भागात वाडीवस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी एस. टी. सोयीस्कर ठरत असल्यामुळे प्रवाशांचा एस. टी.कडे असलेला कल अधिक आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून २००५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एस. टी. महामंडळाने एका गावातील लोकांसाठी ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जादा गाड्यांव्यतिरिक्त दररोज १०० गाड्या विभागातून मुंबईला रवाना होत आहेत.गौरी गणपती पूजनापासूनच जादा गाड्यांची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली होती. गतवर्षी १४३० जादा गाड्यांनी मुंबईकर रवाना झाले होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिक गाड्या मुंबईला रवाना होतील, असा विश्वास एस. टी.च्या पदाधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र, तो फोल ठरला आहे.गेल्या दोन वर्षी ऐन गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. यावर्षी पाऊसच नसल्यामुळे रेल्वे सुविधा सुरळीत सुरू होती. इतकेच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी खास जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवासीवर्ग रेल्वेकडे आकर्षिला गेला. त्यामुळे यावर्षी एस. टी.ला १३० जादा गाड्यांची तूट आल्याने उत्पन्न घटले आहे. (प्रतिनिधी)रेल्वेकडे लोकांचा वाढता कलप्रतिवर्षी एस. टी.ला गणेशोत्सवात एस. टी.ला मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, यंदा अनेक गणेशभक्तांनी रेल्वेची पाऊलवाट पकडली. रेल्वेनेही पुरेशी आणि चांगली सोय केल्याने अनेकांचा प्रवास गर्दीचा झाला असला तरीही सुखकर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एस. टी.कडे पाठ फिरवली. दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी यंदा त्यामानाने कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेत घरी पोहोचता आले.