शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

एस. टी. ‘लॉक’, अर्थकारण ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

रत्नागिरी : संचारबंदीमुळे लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले असून, त्याचा मोठा फटका एस. टी. वाहतुकीला झाला आहे. अत्यावश्यक सुविधा ...

रत्नागिरी : संचारबंदीमुळे लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले असून, त्याचा मोठा फटका एस. टी. वाहतुकीला झाला आहे. अत्यावश्यक सुविधा म्हणून एस. टी. सेवा सुरू ठेवण्यात आली असली तरी प्रवासीच नसल्याने भारमान मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा एस. टी.च्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे.

शासनाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोरोनामुळे नियमावली जाहीर केली आहे. सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, दि. १५ एप्रिलपासून कडक नियमावली जारी करण्यात आली. अत्यावश्यक कारणाशिवाय जनतेला घराबाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आल्याने एस. टी.च्या प्रवासी भारमानावर परिणाम झाला आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात एस. टी.ची चाके दोन ते अडीच महिने पूर्णत: थांबली होती. मात्र, प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने एस. टी. वाहतूक सुरू करण्यात आली. लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. याची झळ महामंडळ व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सोसावी लागली.

एस. टी.ची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागत आहे. प्रवासी संख्या विचारात घेऊनच संबंधित मार्गावरील वाहतूक सुरू आहे. भारमान शून्य असलेल्या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. एस.टी.च्या चालक-वाहकांना हजेरीसाठी आगारात यावे लागत असले तरी पन्नास टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येत आहे. कोरोना संकट काळात प्रवासी वाहतुकीसाठी चालक वाहक तयार असतानाही प्रवाशांअभावी बहुतांश मार्गावरील फेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत. उत्पादन घटले असल्यामुळे दैनंदिन खर्चही वसूल होणे अवघड बनले आहे. गतवर्षी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी गतवर्षीप्रमाणे काहीअंशी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एस.टी.च्या कर्मचाऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

लाॅकडाऊन पूर्वस्थिती

- एस.टी. गाड्या ६०० गाड्या

- दैनंदिन फेऱ्या ४ हजार २००

- किलोमीटर वाहतूक एक लाख ८० हजार

- प्रवासी वाहतूक दोन ते सव्वा दोन लाख

- उत्पन्न ५० लाख

लाॅकडाऊन काळातील स्थिती

- एस.टी. गाड्या ६०० गाड्या

- फेऱ्या २३२

- किलोमीटर वाहतूक १२ हजार ५५०

- प्रवासी वाहतूक दहा हजार

- उत्पन्न २ लाख १६ हजार ६००

कर्मचारी संख्या

एकूण चालक ९५५

वाहक ७६९

चालक कम वाहक १३६६

अन्य कर्मचारी १४१०

दोन दिवसांत पाऊण कोटीचा तोटा

दि.१० व ११ एप्रिल रोजी वीकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. शनिवारी ६८१, तर रविवारी २०१ फेऱ्या संपूर्ण विभागात धावल्या. दोन दिवसांत अवघ्या ४२१४० प्रवाशांनी प्रवास केल्याने २४ लाख ६४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र, दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत दोन दिवसांत ७५ लाख ९३ हजार ५६९ रुपयांचा तोटा विभागाला सोसावा लागला होता.