शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 17:24 IST

जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली.

मेहरुन नाकाडे

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद ’ आंदोलन सुरू आहे. गेले तीन आठवडे चालक, वाहक, कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली. दररोज एसटी काही मिनिटे सुरू करणे, कार्यशाळेत एक फेरी मारणे या प्रकारामुळे विभागातील सर्व गाड्या सुस्थितीत असल्याने लाखोंचा खर्च टळला आहे.

जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होणे, बॅटरी उतरणे, एअरकंडीशन गाड्यांच्या एसी नादुरुस्त होणे याशिवाय गाडी सहज सुरू न होता धक्का मारून सुरू करण्याची समस्या उद्भवली असती. रत्नागिरी विभागात ६०६ गाड्या असून, देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला असता. मात्र हा खर्च अधिकारी, पर्यवेक्षकांच्या तत्परतेमुळे टळला आहे.

जिल्ह्यातील आगार आणि बसेसची संख्या

मंडणगड ४१

दापोली ६४

खेड ६९

चिपळूण ९०

गुहागर ६४

देवरुख ६४

रत्नागिरी ११७

लांजा ४०

राजापूर ५७

जिल्ह्यात बसेसच्या केवळ २०८ फेऱ्या

मंडणगड, रत्नागिरी आगारात कडकडीत बंद

उर्वरित सात आगारात एसटी वाहतूक काही अंशी सुरू

विभागात दिवसभरात अवघ्या २०८ फेऱ्या धावल्याने पावणे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

ग्रामीण भागातील प्रवाशांची एसटी बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे.

बंदमुळे कोट्यवधीचे नुकसान

केवळ ४८३ कर्मचारी कामावर

रत्नागिरी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक, चालक तथा वाहक मिळून एकूण ३७७९ एस. टी. कर्मचारी आहेत.

पावणेचार हजार एस. टी. कर्मचाऱ्यांपैकी ४८३ कर्मचारी कामावर हजर असून ५२ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत.

एकूण ३२४४ कर्मचारी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले असल्यामुळे एस. टी. वाहतूक कोलमडली आहे. प्रशासकीय, कार्यशाळेच्या कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण अधिक आहे.

आतापर्यंत ४५८ जणांवर कारवाई

रत्नागिरी विभागात ३०३ कंत्राटी कर्मचारी आहेत.

एकूण २४९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.

कामावर हजर न झाल्याने एकूण २३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे.

आतापर्यत २२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कामावर हजर होण्याचे सूचित केले होते.

त्यापैकी केवळ बारा कर्मचारी हजर झाले असून प्रशासनाकडून कामावर रुजू करून घेतले आहे.

मेंटेनन्सचा लाखोंचा खर्च वाचला

बॅटऱ्या निकामी होण्याचा धोका टळला आहे.

इंजीन लाॅक होऊ नये, यासाठी काही वेळ इंजीन सुरू ठेवले जाते.

कार्यशाळेच्या आवारात एक फेरी मारली जात असल्याने इंजीन सुस्थितीत राहिली आहेत.

तत्परतेमुळे लाखोंचा खर्च वाचला.

लाॅकडाऊन काळातही एस. टी.चे नुकसान होऊ नये यासाठी दररोज इंजिन सुरू ठेवून फेरी मारण्यात येत होती. त्याप्रमाणेच संपकाळात काळजी घेण्यात आली आहे. कर्मचारी नव्हते, त्यावेळी पर्यवेक्षक, अधिकारी स्वत: इंजिन सुरू करीत असत. मात्र, आता काही कर्मचारी हजर झाल्याने एस. टी.चे इंजिन सुरू करणे, बंद करणे, फेरी मारणे करीत असल्याने देखभाल दुरुस्तीसाठी करावा लागणारा लाखोंचा खर्च यामुळे वाचला आहे. - प्रमोद जगताप, यंत्र अभियंता (चालन)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप