शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 17:24 IST

जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली.

मेहरुन नाकाडे

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद ’ आंदोलन सुरू आहे. गेले तीन आठवडे चालक, वाहक, कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली. दररोज एसटी काही मिनिटे सुरू करणे, कार्यशाळेत एक फेरी मारणे या प्रकारामुळे विभागातील सर्व गाड्या सुस्थितीत असल्याने लाखोंचा खर्च टळला आहे.

जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होणे, बॅटरी उतरणे, एअरकंडीशन गाड्यांच्या एसी नादुरुस्त होणे याशिवाय गाडी सहज सुरू न होता धक्का मारून सुरू करण्याची समस्या उद्भवली असती. रत्नागिरी विभागात ६०६ गाड्या असून, देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला असता. मात्र हा खर्च अधिकारी, पर्यवेक्षकांच्या तत्परतेमुळे टळला आहे.

जिल्ह्यातील आगार आणि बसेसची संख्या

मंडणगड ४१

दापोली ६४

खेड ६९

चिपळूण ९०

गुहागर ६४

देवरुख ६४

रत्नागिरी ११७

लांजा ४०

राजापूर ५७

जिल्ह्यात बसेसच्या केवळ २०८ फेऱ्या

मंडणगड, रत्नागिरी आगारात कडकडीत बंद

उर्वरित सात आगारात एसटी वाहतूक काही अंशी सुरू

विभागात दिवसभरात अवघ्या २०८ फेऱ्या धावल्याने पावणे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.

ग्रामीण भागातील प्रवाशांची एसटी बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे.

बंदमुळे कोट्यवधीचे नुकसान

केवळ ४८३ कर्मचारी कामावर

रत्नागिरी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक, चालक तथा वाहक मिळून एकूण ३७७९ एस. टी. कर्मचारी आहेत.

पावणेचार हजार एस. टी. कर्मचाऱ्यांपैकी ४८३ कर्मचारी कामावर हजर असून ५२ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत.

एकूण ३२४४ कर्मचारी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले असल्यामुळे एस. टी. वाहतूक कोलमडली आहे. प्रशासकीय, कार्यशाळेच्या कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण अधिक आहे.

आतापर्यंत ४५८ जणांवर कारवाई

रत्नागिरी विभागात ३०३ कंत्राटी कर्मचारी आहेत.

एकूण २४९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.

कामावर हजर न झाल्याने एकूण २३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे.

आतापर्यत २२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कामावर हजर होण्याचे सूचित केले होते.

त्यापैकी केवळ बारा कर्मचारी हजर झाले असून प्रशासनाकडून कामावर रुजू करून घेतले आहे.

मेंटेनन्सचा लाखोंचा खर्च वाचला

बॅटऱ्या निकामी होण्याचा धोका टळला आहे.

इंजीन लाॅक होऊ नये, यासाठी काही वेळ इंजीन सुरू ठेवले जाते.

कार्यशाळेच्या आवारात एक फेरी मारली जात असल्याने इंजीन सुस्थितीत राहिली आहेत.

तत्परतेमुळे लाखोंचा खर्च वाचला.

लाॅकडाऊन काळातही एस. टी.चे नुकसान होऊ नये यासाठी दररोज इंजिन सुरू ठेवून फेरी मारण्यात येत होती. त्याप्रमाणेच संपकाळात काळजी घेण्यात आली आहे. कर्मचारी नव्हते, त्यावेळी पर्यवेक्षक, अधिकारी स्वत: इंजिन सुरू करीत असत. मात्र, आता काही कर्मचारी हजर झाल्याने एस. टी.चे इंजिन सुरू करणे, बंद करणे, फेरी मारणे करीत असल्याने देखभाल दुरुस्तीसाठी करावा लागणारा लाखोंचा खर्च यामुळे वाचला आहे. - प्रमोद जगताप, यंत्र अभियंता (चालन)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप