शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

लाॅकडाऊनमध्ये एस. टी. बंद, वर्कशाॅप मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस. टी. बसेस साेडण्याचे आदेश ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस. टी. बसेस साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेत नसतानाही एस. टी. महामंडळाचे वर्कशाॅप सुरू ठेवण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. वर्कशाॅपमधील अंतर्गत वादामुळे कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने कर्मचाऱ्यांमधूनही या धाेरणाबाबत संतप्त भावना व्यक्त हाेत आहेत.

काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा देण्यात आली आहे. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसेस साेडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने त्यांच्या अखत्यारित येणारे वर्कशाॅप मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनच्या काळात काेराेनापासून कामगारांचे संरक्षण हाेण्यासाठी वर्कशाॅप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले हाेते. मात्र, गुरूवारपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत नसतानाही वर्कशाॅप सुरू ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

औद्याेगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एस. टी.च्या वर्कशाॅपमध्ये दाेन सत्रात ५०-५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा नियमही पायदळी तुडवला जात असल्याची चर्चा आहे. वर्कशाॅपमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी एकत्रितपणे काम करत असल्याने साेशल डिस्टन्सिंगही पाळण्यात येत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वर्कशाॅपमधील अंतर्गत वादातून लाॅकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावण्याचा निर्णय झाल्याची जाेरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरीतील एका लाेकप्रतिनिधीच्या सहकाऱ्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे काम सुरू ठेवण्यात आल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काेराेनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आराेग्याशी न खेळण्याची मागणी करण्यात येत असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

-------------------------

राजकारणात कर्मचाऱ्यांचा बळी

रत्नागिरीतील वर्कशाॅपमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका गटाचा पराभव झाल्याने नवा वाद सुरू झाला आहे. त्यातूनच आता कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पराभूत झालेल्या गटाच्या व्यक्तीकडून राजकीय दबाव आणण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.