शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

लाॅकडाऊनमध्ये एस. टी. बंद, वर्कशाॅप मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस. टी. बसेस साेडण्याचे आदेश ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस. टी. बसेस साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेत नसतानाही एस. टी. महामंडळाचे वर्कशाॅप सुरू ठेवण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. वर्कशाॅपमधील अंतर्गत वादामुळे कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने कर्मचाऱ्यांमधूनही या धाेरणाबाबत संतप्त भावना व्यक्त हाेत आहेत.

काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा देण्यात आली आहे. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसेस साेडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस. टी. सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने त्यांच्या अखत्यारित येणारे वर्कशाॅप मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनच्या काळात काेराेनापासून कामगारांचे संरक्षण हाेण्यासाठी वर्कशाॅप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले हाेते. मात्र, गुरूवारपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत नसतानाही वर्कशाॅप सुरू ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

औद्याेगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एस. टी.च्या वर्कशाॅपमध्ये दाेन सत्रात ५०-५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा नियमही पायदळी तुडवला जात असल्याची चर्चा आहे. वर्कशाॅपमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी एकत्रितपणे काम करत असल्याने साेशल डिस्टन्सिंगही पाळण्यात येत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वर्कशाॅपमधील अंतर्गत वादातून लाॅकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावण्याचा निर्णय झाल्याची जाेरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरीतील एका लाेकप्रतिनिधीच्या सहकाऱ्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे काम सुरू ठेवण्यात आल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काेराेनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आराेग्याशी न खेळण्याची मागणी करण्यात येत असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

-------------------------

राजकारणात कर्मचाऱ्यांचा बळी

रत्नागिरीतील वर्कशाॅपमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका गटाचा पराभव झाल्याने नवा वाद सुरू झाला आहे. त्यातूनच आता कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पराभूत झालेल्या गटाच्या व्यक्तीकडून राजकीय दबाव आणण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.