शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जखमींची तडफड अन् वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: December 10, 2015 00:57 IST

‘सिव्हील’मधील दृश्य : मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी सुतारवाडी वळणावर ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सुखरूपपणे अपघात विभागात दाखल करताना कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकांची धावपळ उडाली होती. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात आलेल्या जखमी व मृतांच्या नातेवाईकांना अश्रू आवरत नव्हते. सकाळी ७.४५ वाजता चिपळूण येथून सुटलेल्या एस. टी. बसला ट्रकने ठोकरल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघाताची वार्ता शहर परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक रत्नागिरीकर बावनदीजवळील अपघातस्थळी पोहोचले. एस. टी. महामंडळाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी या अपघातानंतर वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळावी, यासाठी सतर्क झाले होते. रूग्णवाहिकांमधून आणण्यात येणाऱ्या जखमींना स्ट्रेचरवरून नेण्यात येत होते. त्याचवेळी अपघात विभागामध्ये जखमी पुरुष रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पुरुष शल्य विभागात हलविण्यात आले.यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. रसाळ, यंत्र अभियंता के. वाय. फकीर, डेपो मॅनेजर एस. वाय. शेरे, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक भारत सावंत, वाहतूक निरीक्षक ए. ए. पाटील, राजेश पाथरे आदी अधिकारी रुग्णांची माहिती घेत होते. या अपघातानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर, दत्ता देसाई, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, भाई जठार, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजू भाटलेकर, यासीन मामू, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाइलवरून अपघाताची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अनेक नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हाता-पायाला फ्रॅक्चर, डोके, तोंड, छाती, दात, नाकाला दुखापती झाल्या आहेत. काहींना मुका मारही बसलेला आहे. (शहर वार्ताहर)निवळी घाटात भीषण अपघात झाल्याचे वृत्त सकाळी ९.३० वाजता फोनव्दारे कळाल्याबरोबर १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका अपघातस्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. जिल्हा शासकीय रूग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या. तातडीने काही बेड तयार करण्यात आले. पुरूष, स्त्री दोन्ही वॉर्डात गरजेनुसार जमिनीवरही बेड तयार करण्यात आले. आलेल्या रूग्णांची तपासणी करून जखमेचे ड्रेसींग करणे, टाके घालणे, सलाईन लावणे रूग्णासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होत्या. रूग्ण पहिल्या मजल्यावर आणताना अचानक लिफ्टही तांत्रिक दोषामुळे पाच मिनिटे बंद झाली. परंतु तातडीने तीही दुरूस्त करण्यात आली. १४ डॉक्टर रूग्णाच्या सेवेसाठी हजर होते.- डॉ.बी.डी.आरसूळकर, जिल्हा शल्यचिकीत्सक रत्नागिरी.कडवईतून दररोज रत्नागिरीत अप्रेंटशीपकरिता येतो. अचानक ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळले नाही. मात्र, डोके व तोंड जोरात आपटले. डोक्यातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. एस. टी.तील विदारक दृश्य पाहता आपण बचावलो असल्याबद्दलची खात्री पटली. अन्य जखमी प्रवाशांप्रमाणे मीही अपघातग्रस्त एस. टी.तून बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर खिशातील मोबाईल काढून तातडीने नातेवाईकांना अपघाताची खबर दिली. त्यानंतर अन्य जखमी रूग्णांबरोबर मलाही जिल्हा शासकीय रूणालयात आणले. उपचार सुरू झाले. डोक्यातून झालेला रक्तस्त्राव, तोंडालाही मार बसल्यामुळे दात पडले, तोंडातूनही रक्तस्त्राव खूप झाला. मात्र आपण बचावलो, ही अल्लाहची मेहेरबानी आहे.- नौमान जुवळे, कडवई.