शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जखमींची तडफड अन् वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: December 10, 2015 00:57 IST

‘सिव्हील’मधील दृश्य : मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी सुतारवाडी वळणावर ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सुखरूपपणे अपघात विभागात दाखल करताना कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकांची धावपळ उडाली होती. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात आलेल्या जखमी व मृतांच्या नातेवाईकांना अश्रू आवरत नव्हते. सकाळी ७.४५ वाजता चिपळूण येथून सुटलेल्या एस. टी. बसला ट्रकने ठोकरल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघाताची वार्ता शहर परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक रत्नागिरीकर बावनदीजवळील अपघातस्थळी पोहोचले. एस. टी. महामंडळाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी या अपघातानंतर वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळावी, यासाठी सतर्क झाले होते. रूग्णवाहिकांमधून आणण्यात येणाऱ्या जखमींना स्ट्रेचरवरून नेण्यात येत होते. त्याचवेळी अपघात विभागामध्ये जखमी पुरुष रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पुरुष शल्य विभागात हलविण्यात आले.यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. रसाळ, यंत्र अभियंता के. वाय. फकीर, डेपो मॅनेजर एस. वाय. शेरे, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक भारत सावंत, वाहतूक निरीक्षक ए. ए. पाटील, राजेश पाथरे आदी अधिकारी रुग्णांची माहिती घेत होते. या अपघातानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर, दत्ता देसाई, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, भाई जठार, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजू भाटलेकर, यासीन मामू, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाइलवरून अपघाताची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अनेक नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हाता-पायाला फ्रॅक्चर, डोके, तोंड, छाती, दात, नाकाला दुखापती झाल्या आहेत. काहींना मुका मारही बसलेला आहे. (शहर वार्ताहर)निवळी घाटात भीषण अपघात झाल्याचे वृत्त सकाळी ९.३० वाजता फोनव्दारे कळाल्याबरोबर १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका अपघातस्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. जिल्हा शासकीय रूग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या. तातडीने काही बेड तयार करण्यात आले. पुरूष, स्त्री दोन्ही वॉर्डात गरजेनुसार जमिनीवरही बेड तयार करण्यात आले. आलेल्या रूग्णांची तपासणी करून जखमेचे ड्रेसींग करणे, टाके घालणे, सलाईन लावणे रूग्णासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होत्या. रूग्ण पहिल्या मजल्यावर आणताना अचानक लिफ्टही तांत्रिक दोषामुळे पाच मिनिटे बंद झाली. परंतु तातडीने तीही दुरूस्त करण्यात आली. १४ डॉक्टर रूग्णाच्या सेवेसाठी हजर होते.- डॉ.बी.डी.आरसूळकर, जिल्हा शल्यचिकीत्सक रत्नागिरी.कडवईतून दररोज रत्नागिरीत अप्रेंटशीपकरिता येतो. अचानक ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळले नाही. मात्र, डोके व तोंड जोरात आपटले. डोक्यातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. एस. टी.तील विदारक दृश्य पाहता आपण बचावलो असल्याबद्दलची खात्री पटली. अन्य जखमी प्रवाशांप्रमाणे मीही अपघातग्रस्त एस. टी.तून बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर खिशातील मोबाईल काढून तातडीने नातेवाईकांना अपघाताची खबर दिली. त्यानंतर अन्य जखमी रूग्णांबरोबर मलाही जिल्हा शासकीय रूणालयात आणले. उपचार सुरू झाले. डोक्यातून झालेला रक्तस्त्राव, तोंडालाही मार बसल्यामुळे दात पडले, तोंडातूनही रक्तस्त्राव खूप झाला. मात्र आपण बचावलो, ही अल्लाहची मेहेरबानी आहे.- नौमान जुवळे, कडवई.