शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जखमींची तडफड अन् वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: December 10, 2015 00:57 IST

‘सिव्हील’मधील दृश्य : मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी सुतारवाडी वळणावर ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सुखरूपपणे अपघात विभागात दाखल करताना कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकांची धावपळ उडाली होती. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात आलेल्या जखमी व मृतांच्या नातेवाईकांना अश्रू आवरत नव्हते. सकाळी ७.४५ वाजता चिपळूण येथून सुटलेल्या एस. टी. बसला ट्रकने ठोकरल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघाताची वार्ता शहर परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक रत्नागिरीकर बावनदीजवळील अपघातस्थळी पोहोचले. एस. टी. महामंडळाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी या अपघातानंतर वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळावी, यासाठी सतर्क झाले होते. रूग्णवाहिकांमधून आणण्यात येणाऱ्या जखमींना स्ट्रेचरवरून नेण्यात येत होते. त्याचवेळी अपघात विभागामध्ये जखमी पुरुष रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पुरुष शल्य विभागात हलविण्यात आले.यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. रसाळ, यंत्र अभियंता के. वाय. फकीर, डेपो मॅनेजर एस. वाय. शेरे, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. जाधव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक भारत सावंत, वाहतूक निरीक्षक ए. ए. पाटील, राजेश पाथरे आदी अधिकारी रुग्णांची माहिती घेत होते. या अपघातानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष संजय पुनसकर, दत्ता देसाई, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, भाई जठार, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजू भाटलेकर, यासीन मामू, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाइलवरून अपघाताची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अनेक नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हाता-पायाला फ्रॅक्चर, डोके, तोंड, छाती, दात, नाकाला दुखापती झाल्या आहेत. काहींना मुका मारही बसलेला आहे. (शहर वार्ताहर)निवळी घाटात भीषण अपघात झाल्याचे वृत्त सकाळी ९.३० वाजता फोनव्दारे कळाल्याबरोबर १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका अपघातस्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. जिल्हा शासकीय रूग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या. तातडीने काही बेड तयार करण्यात आले. पुरूष, स्त्री दोन्ही वॉर्डात गरजेनुसार जमिनीवरही बेड तयार करण्यात आले. आलेल्या रूग्णांची तपासणी करून जखमेचे ड्रेसींग करणे, टाके घालणे, सलाईन लावणे रूग्णासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होत्या. रूग्ण पहिल्या मजल्यावर आणताना अचानक लिफ्टही तांत्रिक दोषामुळे पाच मिनिटे बंद झाली. परंतु तातडीने तीही दुरूस्त करण्यात आली. १४ डॉक्टर रूग्णाच्या सेवेसाठी हजर होते.- डॉ.बी.डी.आरसूळकर, जिल्हा शल्यचिकीत्सक रत्नागिरी.कडवईतून दररोज रत्नागिरीत अप्रेंटशीपकरिता येतो. अचानक ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोठा आवाज झाला. क्षणभर काहीच कळले नाही. मात्र, डोके व तोंड जोरात आपटले. डोक्यातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. एस. टी.तील विदारक दृश्य पाहता आपण बचावलो असल्याबद्दलची खात्री पटली. अन्य जखमी प्रवाशांप्रमाणे मीही अपघातग्रस्त एस. टी.तून बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर खिशातील मोबाईल काढून तातडीने नातेवाईकांना अपघाताची खबर दिली. त्यानंतर अन्य जखमी रूग्णांबरोबर मलाही जिल्हा शासकीय रूणालयात आणले. उपचार सुरू झाले. डोक्यातून झालेला रक्तस्त्राव, तोंडालाही मार बसल्यामुळे दात पडले, तोंडातूनही रक्तस्त्राव खूप झाला. मात्र आपण बचावलो, ही अल्लाहची मेहेरबानी आहे.- नौमान जुवळे, कडवई.