शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साडेसहा कोटी अनुदान अखर्चित

By admin | Updated: December 4, 2014 23:38 IST

देयके रखडली : दोन वर्षे उलटली तरी अंगणवाड्यांसाठीचा निधी पडून

रहिम दलाल - रत्नागिरी  -ग्रामीण भागातील ३४१ अंगणवाड्यांची कामे पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी देयके अदा न झाल्याने ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी वेळोवेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा करुनही राज्य शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १३६५ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या सध्या समाजमंदिरात भरविण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे़ मात्र, अंगणवाड्या बांधकामासाठी ग्रामीण भागामध्ये जमीनमालक जागा देण्यास तयार होत नसल्याने इमारती कशा बांधणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ सुरुवातीला अंगणवाडी बांधकामासाठी ३ लाख ५० हजार रुपये देण्यात येत होते़ त्यामध्ये वाढ होऊन ४ लाख ५० हजार रुपये झाले़ त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाल्याने आता अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी ६ लाख रुपये अनुदान देण्यात येते़ मात्र, ज्या ३४१ अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या, त्या प्रत्येक इमारतीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते़ यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, नाबार्ड आणि तेराव्या वित्त आयोगातून ही कामे घेण्यात आली होती़ या इमारतींच्या कामांना मंजुरी देण्यात आली़ ही कामे ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आली़ या कामांचा काही निधी देण्यात आला़ मात्र, अजूनही निधी देणे शिल्लक आहे़या कामांसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ६ कोटी ४५ लाख रुपये अनुदान आले होते़ अंगणवाड्यांच्या इमारतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदान संबंधितांना देणे आवश्यक होते़ मात्र, हे अनुदान गेली दोन वर्षे अखर्चित राहिले आहे़ महिला व बालकल्याण विभागाकडून हे अनुदान खर्ची घालण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे़ मात्र, या इमारतींची कामे वेळेवर करण्यात आली नसल्याचा ठपका शासनाकडून ठेवण्यात आला आहे़ त्यामुळे शासनाकडून हे अनुदान खर्ची घालण्यास अडकाठी आणली जात आहे़ त्यामुळे गेली दोन वर्षे हे अनुदान अखर्चित राहिले आहे़ शासनाने आतातरी या रखडलेल्या अनुदानाबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात येत आहे.शासनाचे दुर्लक्ष...अंगणवाड्यांची कामे पूर्ण होऊन त्यामध्ये बालकांचा किलबिलाट सुरु आहे़ अंगणवाड्या सुरु होऊनही बांधकामाचा खर्च न मिळाल्याने ग्रामपंचायतींकडून ओरड सुरु आहे़ मात्र, महिला व बालकल्याण विभागाकडून हा निधी खर्ची घालण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरुच आहे़ मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने हा निधी अखर्चित राहिला असून त्यामुळे इमारती बांधल्यानंतर दोन वर्षांनीही निधी अखर्चितच राहिला आहे.