शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विमानतळासाठी ३५0 कोटींचा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:05 IST

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विमानतळाबाबत आढावा ...

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विमानतळाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रत्नागिरीत रविवारी राऊंड टेबल परिषद घेण्यात आली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. संपूर्ण देशातील जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासानंतर राज्य व देश विकसित करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विकास आराखडे तयार केले जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यांच्या विकास आराखड्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे. विविध शासकीय माध्यमांतून दोन्ही जिल्ह्यांचा सर्व्हे यापूर्वीच करण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार केला असून, आजपासून अंमलबजावणीला प्रारंभ होणार असल्याचे मंत्री प्रभू यांनी सांगितले.विविध शासकीय योजना जनमानसापर्यंत पोहोचवत असताना काही सामाजिक संस्था त्यामध्ये आपला महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे या माध्यमातून कार्यरत आहे. संस्थेतर्फे नर्सिंग कॉलेज सुरू असून, याठिकाणी शिक्षण घेतलेल्या महिला आज नामवंत रुग्णालयांसह परदेशातील रुग्णालयातही कार्यरत आहेत. युपीन फाउंडेशनसारखी संस्था शेतीसाठी कार्यरत आहे. सरकारला जनतेचे प्रश्न समजले पाहिजेत व जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळाली पाहिजे, यासाठी कार्यरत असणाºया महिलांना इलेक्ट्रिकल ५०० सायकलींचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.चार महिन्यांत रत्नागिरी, सिंधुदुर्गातून विमानसेवारत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. याची तारीख मी आता घोषित करीत नाही. यासाठी दिल्लीत बैठक झाली असून, मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे; परंतु चार महिन्यांच्या कालावधीत विमानसेवा निश्चितच सुरू होईल,