शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

विमानतळासाठी ३५0 कोटींचा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:05 IST

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विमानतळाबाबत आढावा ...

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विमानतळाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रत्नागिरीत रविवारी राऊंड टेबल परिषद घेण्यात आली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. संपूर्ण देशातील जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासानंतर राज्य व देश विकसित करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विकास आराखडे तयार केले जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यांच्या विकास आराखड्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे. विविध शासकीय माध्यमांतून दोन्ही जिल्ह्यांचा सर्व्हे यापूर्वीच करण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार केला असून, आजपासून अंमलबजावणीला प्रारंभ होणार असल्याचे मंत्री प्रभू यांनी सांगितले.विविध शासकीय योजना जनमानसापर्यंत पोहोचवत असताना काही सामाजिक संस्था त्यामध्ये आपला महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे या माध्यमातून कार्यरत आहे. संस्थेतर्फे नर्सिंग कॉलेज सुरू असून, याठिकाणी शिक्षण घेतलेल्या महिला आज नामवंत रुग्णालयांसह परदेशातील रुग्णालयातही कार्यरत आहेत. युपीन फाउंडेशनसारखी संस्था शेतीसाठी कार्यरत आहे. सरकारला जनतेचे प्रश्न समजले पाहिजेत व जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळाली पाहिजे, यासाठी कार्यरत असणाºया महिलांना इलेक्ट्रिकल ५०० सायकलींचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.चार महिन्यांत रत्नागिरी, सिंधुदुर्गातून विमानसेवारत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. याची तारीख मी आता घोषित करीत नाही. यासाठी दिल्लीत बैठक झाली असून, मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे; परंतु चार महिन्यांच्या कालावधीत विमानसेवा निश्चितच सुरू होईल,