शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

रस्ते हस्तांतरणप्रकरणी बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:26 IST

दारुची दुकाने बंद झाल्यामुळे दापोली नगरपंचायतीचा २००२ च्या ठरावाचा आधार

शिवाजी गोरे/आॅनलाईन लोकमतदापोली (जि. रत्नागिरी), दि. २२ : न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील दारुची दुकाने बंद झाल्यामुळे दापोली नगरपंचायतीने २००२ च्या ठरावाचा आधार घेऊन रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव दाखल केला. मात्र, त्यानंतर कसल्याही प्रकारची शहानिशा न करताच अवघ्या दोन महिन्यात हा प्रस्ताव मंजूर केल्याने यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिकाही संशयास्पद असल्याची टीका आता होत आहे. दापोली नगरपंचायतीने रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर बांधकाम विभागाकडून या प्रस्तावाची शहानिशा होणे गरजेचे होते. नगरपंचायतीने मागणी केलेल्या रस्त्याचे मोजमाप करुन नगरपंचायतीला लेखी पत्रव्यवहार बांधकाम विभागाने करायला हवा होता. त्या पत्रव्यवहारावर नगरपंचायतीचे नोटिंग व्हायला हवे होते. परंतु, बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीला याबाबत काहीही लेखी कळवण्यात आले नाही, असेही सांगितले जात आहे. रस्ते हस्तांतरण प्रस्तावाची कोणतीही कागदपत्रे नगरपंचायतीकडे नाहीत, त्यामुळे दापोली नगरपंचायत रस्ते हस्तांतरण प्रकरणाची येत्या आठ दिवसांत चौकशी लागणार असून, या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीच्या भूमिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिकाही संशयास्पद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल झालेल्या ठरावात काही त्रुटी आहेत का ते पाहायला हवे होते. तसेच २००२चा मूळ ठराव काय होता, त्या ठरावाची प्रत तपासून पाहणे आवश्यक होते. कारणापुरती केलेली नक्कल पाहून हा प्रस्ताव पुढे मार्गस्थ झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असून, संबंधित अधिकाऱ्यांचे हातही यामध्ये ओले झाले आहेत का? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

सार्वजनिक बांधकाम आयुक्तांकडे संबंधित प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या प्रस्तावाची चक्र अतिशय वेगाने फिरली. मंत्रालय स्तरावरुन याचा पाठपुरावा झाल्याची चर्चा होत आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी अनेकांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले आहेत. नगरपंचायतीने प्रस्ताव दाखल केल्यापासून ते शासननिर्णय निघण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, यामधील संबंधित यंत्रणांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना? असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.