शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात...

By admin | Updated: May 3, 2017 23:30 IST

रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात...

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरींकोकण रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता रोहा ते दासगाव (महाड) या ४६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण काम वेगात सुरू आहे. ३५० कोटी रुपये खर्चाचे हे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या चार ते पाच वर्षात मार्गाचे दुपदरीकरण गोव्यापर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. कोकणवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने ४० वर्षांपूर्वी पनवेल ते रोहा रेल्वे मार्ग उभारला. मात्र, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात मध्य रेल्वेने प्रचंड दुर्लक्ष केले. त्यामुळे चार दशके हा मार्ग एकेरीवर राहिला होता. कोकण रेल्वे १९९७ला सुरू झाल्यानंतर पनवेल ते रोहा मार्गाच्या दुपदरीकरणाचे वारे सुरू झाले. त्यानंतरही दुपदरीकरणाचे काम तब्बल दहा वर्षांनंतर कार्यवाहीत येईल, असे चित्र निर्माण झाले. २००९ ते २०११ या काळात पनवेल - रोहा मार्गाचे दुपदरीकरण होणार होते. त्यासाठी या ७५ किलोमीटर मार्गाचे पनवेल-पेण ३५ किलोमीटर, तर पेण - रोहा ४० किलोमीटर असे दोन टप्पे करण्यात आले होेते. मात्र, त्यातही हेळसांड झाली. अखेर मार्च २०१७मध्ये या मार्गाचे दुपदरीकरण काम एकदाचे पूर्ण झाले आहे. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामांना गती मिळाली आहे. मध्य रेल्वेकडून पनवेल-रोहा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच रोहा-दासगाव (महाड) या कोकण रेल्वेच्या मार्गाचे दुपदरीकरण काम नोव्हेंबर २०१६मध्येच सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ या नियोजित वेळेपर्यत हे काम पूर्ण होणार आहे. कोकण रेल्वेचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालिन अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्यासह रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज कोकणातून रेल्वे धावते आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोकण रेल्वेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. २० वर्षांपूर्वी सुरू झालेला कोकण रेल्वे प्रकल्प मधल्या १५ वर्षांच्या काळात दुर्लक्षित राहिला. या मार्गाचा विकास झाला नाही. विकासाचा हा अनुशेष पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोकणातील दुसरे मंत्री सुरेश प्रभू यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाची संजीवनी ठरलेल्या कोकण रेल्वेला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे. त्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्पातील असंख्य विकासकामे पूर्ण झाली आहेत व अनेक कामे सध्या सुरू आहेत. अनेक नवीन रेल्वे स्थानकेही कोकणात झाली असून, त्यांची कामे सुरू आहेत. प्रवाशांना गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमध्ये अनेक आधुनिक सुविधाही मिळू लागल्या आहेत.