शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात...

By admin | Updated: May 3, 2017 23:30 IST

रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात...

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरींकोकण रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता रोहा ते दासगाव (महाड) या ४६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण काम वेगात सुरू आहे. ३५० कोटी रुपये खर्चाचे हे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या चार ते पाच वर्षात मार्गाचे दुपदरीकरण गोव्यापर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. कोकणवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने ४० वर्षांपूर्वी पनवेल ते रोहा रेल्वे मार्ग उभारला. मात्र, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात मध्य रेल्वेने प्रचंड दुर्लक्ष केले. त्यामुळे चार दशके हा मार्ग एकेरीवर राहिला होता. कोकण रेल्वे १९९७ला सुरू झाल्यानंतर पनवेल ते रोहा मार्गाच्या दुपदरीकरणाचे वारे सुरू झाले. त्यानंतरही दुपदरीकरणाचे काम तब्बल दहा वर्षांनंतर कार्यवाहीत येईल, असे चित्र निर्माण झाले. २००९ ते २०११ या काळात पनवेल - रोहा मार्गाचे दुपदरीकरण होणार होते. त्यासाठी या ७५ किलोमीटर मार्गाचे पनवेल-पेण ३५ किलोमीटर, तर पेण - रोहा ४० किलोमीटर असे दोन टप्पे करण्यात आले होेते. मात्र, त्यातही हेळसांड झाली. अखेर मार्च २०१७मध्ये या मार्गाचे दुपदरीकरण काम एकदाचे पूर्ण झाले आहे. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामांना गती मिळाली आहे. मध्य रेल्वेकडून पनवेल-रोहा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच रोहा-दासगाव (महाड) या कोकण रेल्वेच्या मार्गाचे दुपदरीकरण काम नोव्हेंबर २०१६मध्येच सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ या नियोजित वेळेपर्यत हे काम पूर्ण होणार आहे. कोकण रेल्वेचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालिन अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्यासह रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज कोकणातून रेल्वे धावते आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोकण रेल्वेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. २० वर्षांपूर्वी सुरू झालेला कोकण रेल्वे प्रकल्प मधल्या १५ वर्षांच्या काळात दुर्लक्षित राहिला. या मार्गाचा विकास झाला नाही. विकासाचा हा अनुशेष पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोकणातील दुसरे मंत्री सुरेश प्रभू यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाची संजीवनी ठरलेल्या कोकण रेल्वेला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे. त्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्पातील असंख्य विकासकामे पूर्ण झाली आहेत व अनेक कामे सध्या सुरू आहेत. अनेक नवीन रेल्वे स्थानकेही कोकणात झाली असून, त्यांची कामे सुरू आहेत. प्रवाशांना गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमध्ये अनेक आधुनिक सुविधाही मिळू लागल्या आहेत.