शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण;

By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST

सरकारचा नाकर्तेपणा व उदासिनता

श्रीकांत चाळके: खेड, तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत.़सरकारचा नाकर्तेपणा आणि अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्याचीे मागणी होत होती. आता पावसाळा सुरू झाल्याने एकाही रस्त्याचे काम होऊ शकणार नसल्याने रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण लागले आहे.याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत संघटक पांडुरंग पटवर्धन यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा ठरवणारी यंत्रणाच किडली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक आंब्रे यांनी दर्जा ठरवणाऱ्या यंत्रणेत प्रतिवर्षी बदल करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, आमदार यांच्यावरच अवलंबून असते. मात्र, एखाद्या विभागातील रस्त्याचे डांबरीकरण करायचे असेल, तर त्या विभागातील ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा तेथील विशिष्ट पक्षाची मतदारांची संख्या विचारात घेऊनच त्या कामाला पसंती दिली जाते.खेड तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते या भागातील गावांना जोडण्यात आले आहेत़ १९६५ मध्ये निर्मिती झालेल्या या रस्त्यांची चाळण झाली आहे़ ४० वर्षात केवळ दोनवेळा डांबरीकरण केलेल्या या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची ओरड येथील स्थानिकांकडून होत आहे. तसेच या विभागातील दोन प्रमुख पक्षांच्या घुसखोरीमुळे या मार्गावरील रस्ते आपसातील राजकीय वैमनस्यामुळे तसेच पडून राहीले़ या भागातील खाडीपट्टा, कर्जी, संगलट, शिर्शी या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पंधरागाव धामणंद विभागातील रस्ते अनेक वर्षे नादुरूस्त आहेत. गेल्या दोन वर्षांत रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला. आता पाऊस सुरू झाल्याने ही कामे लांबली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट होणार आहे. येथे पाणी नाही, एस. टी. नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत़ रस्ता दुरूस्तीसाठीच्या निधीसाठी राजकीय सलगी वाढविण्यात येते. गावपुढाऱ्यावर बरेच काही चालत असल्याने रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जी झाली ती काही भागात झाली, असे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रस्ते दर्जाहीन होत असल्याने अशी समस्या वारंवार उद्भवते. यासाठी राज्य सरकारचा निधी त्याच ठिकाणी वापरावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजकीय संघर्षात खेड तालुक्यातील रस्ते सापडले असून, या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. त्यात कोणतेही राजकारण आणू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.खेड तालुक्यातील पंधरागाव भागातील रस्ते खराब झाले. कित्येक वर्षात रस्ता दुरूस्त झाला की नाही, हे पाहायला लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेही नाहीत. यावेळी मात्र या रस्त्यांची माहिती वरिष्ठांकडे पाठवली असून, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल.