शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

भाजीपाला आवक रोडावल्याने दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाला, फळांची आवक रोडावली आहे. पावसाळ्यासाठी बेगमीची तयारी सुरू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाला, फळांची आवक रोडावली आहे. पावसाळ्यासाठी बेगमीची तयारी सुरू झाली असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.

कोरोनामुळे शासकीय निर्बंध असल्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजी, फळे विक्री सुरू आहे. आसपासच्या जिल्ह्यातून भाज्या विक्रीला येत आहेत. दररोज होणारी आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. वाढते दर परवडेनासे झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. पावसाळ्यासाठी तांदुळ, गहू, कांदे, कडधान्ये, डाळींची खरेदी करून ठेवण्यात येते. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनचा सामना करताना, अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घाऊक खरेदी करण्याऐवजी हातात प्राप्त रकमेतूनच खरेदी करण्यात येत आहे. खाद्यतेलापासून डाळी, कडधान्ये, तांदळाचे दर कडाडले असल्याने बजेट जुळविणे अवघड बनले आहे.

तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पालेभाज्या, फळभाज्यांना वाढती मागणी असते. मात्र उत्पादनात घट झाली असल्याने दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची जुडी २० रुपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीच्या दरातही वाढ झाली आहे.

शरीरातील पाण्याची पातळी कमी हाेत असून थकवा जाणवत असल्याने लिंबूपाणी सेवन केले जाते. ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असल्याने लिंबांना वाढती मागणी असून दहा रुपयांना दोन ते तीन नग दराने विक्री सुरू आहे.

उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन प्राधान्याने केले जाते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड सेवन फायदेशीर ठरते. २० ते २५ रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. रमजानमुळे कलिंगडाला विशेष मागणी होत असून माल हातोहात संपत आहे.

पावसाळ्यासाठी बेगमीच्या जिन्नसांची खरेदी या दिवसात केली जाते. गतवर्षीपासून लाॅकडाऊन व त्यातच वाढती महागाई यामुळे दैनंदिन खर्च भागविणेच अवघड बनले आहे.

- प्रज्ञा चाळके, गृहिणी

कोरोनाचे संकट असतानाच महागाईने जीव मेटाकुटीस आणला आहे. खाद्यतेलाचे दर तर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे भविष्यात फोडणीशिवायच स्वयंपाक करावा लागणार आहे.

- रूपा गांगण, गृहिणी