शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार

By admin | Updated: May 7, 2017 23:43 IST

रिक्षाची कठड्याला धडक : दोन ठार

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या खांबाला रिक्षाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले़, तर तिघेजण गंभीर जखमी झाले़ रिक्षाचालक ईश्वर दशरथ दोडामणी व सहप्रवासी अशोक लक्ष्मण चव्हाण अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.ही घटना रविवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.संतोष जनार्दन विसपुते (पोलीस वसाहत, रत्नागिरी) हे रत्नागिरी कारागृहात कार्यरत आहेत़ ते आपल्या कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात आले. तेथून ते रिक्षाने (एमएच-०८-के-३८७२) एस.टी. स्टॅण्डच्या दिशेने येण्यासाठी निघाले. अशोक चव्हाण, संतोष विसपुते यांच्यासह दक्षिता व वैभवी या दोन मुली रिक्षातून प्रवास करत होत्या. रिक्षाचालक ईश्वर दोडामणी याने रिक्षा भरधाव वेगाने शहराच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली़ त्याची रिक्षा पहाटे ४़१५ वाजण्याच्या सुमारास माळनाका परिसरात आली असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि रिक्षा स्कायवॉकच्या खांबाला जोरदार धडकली.अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. रिक्षाचालक दोडामणी व अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले़ संतोष विसपुते व दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमी संतोष विसपुते, दक्षिता व वैभवी या तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.