शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

गणेशमूर्तीचा मोबदला म्हणून अजूनही दिले जाते भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:13 IST

मेहरून नाकाडे  रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची ...

ठळक मुद्देशिपोशीतील नागवेकर कुटुंबाचा तीन पिढ्यांपासूनचा वारसा आजही कायमपूर्वी मोबदल्याचा भात आणावे लागत असे बैलागाडीतून

मेहरून नाकाडे रत्नागिरी : बलुतेदारी पध्दत आता कालबाह्य झाली असली तरी आजही ग्रामीण भागात काही व्यवहारांमध्ये धान्याच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत आहे. पूर्वी गणेशमूर्ती बनवणाऱ्यांना मोबदला म्हणून शेतकरी धान्य देत. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील मूर्तिकार नागवेकर कुटुंबाने तीन पिढ्यांपासून हा वारसा आजही जपला आहे. या गावात मूर्तीसाठी पैसे न देता आजही भात दिले जात आहे.शिपोशी येथील वामन जनार्दन नागवेकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. मूर्तिशाळेत १५० ते १७५ गणेशमूर्ती तयार करण्यात येत असत. त्यावेळी गावातील तसेच बाजूच्या केळवली, सालपे गावातील शेतकरी गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती घरी घेऊन जात असत. मात्र, त्यासाठी पैसे न देता त्याऐवजी भात देण्यात येत असे.

शंभर टक्के लोक त्यावेळी भातच देत असत. आठ पायली ते मणभर भात देण्यात येत असे. भात कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या सणाला गावातील शेतकरी वामन नागवेकर यांना बोलावून भात देत असत. त्यामुळे खंडीभर भात गोळा होत असे. बैलगाडीतून भात घरी आणला जात असे.वामन यांच्याकडून सुरू झालेली ही प्रथा त्यांचे पुत्र दत्ताराम यांनीही जपली होती. आता तर दीपक यांची तिसरी पिढी या प्रथेचे पालन करीत आहे. काळाच्या ओघात भात देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही दहा ते बारा लोक पैसे न देता, भातच देत आहेत.

नागवेकर कुटुंबियांनाही पैशांऐवजी भातच घेणे आवडते. त्यामुळे गावठी भात उपलब्ध होतो. आजही दीपक यांच्याकडे शाडूच्या मातीपासून १५० गणपती तयार केले जातात. सध्या त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे रंगकाम सुरू आहे. कारखान्यातील कलाकार रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत.यावर्षी कोरोनामुळे बहुसंख्य मंडळींचे रोजगार गेले आहेत. नोकरी गेल्याने मुंबईकर गावीच थांबले असून, शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या मोबदल्यात भात देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रंग व साहित्याचा वापर केला जात आहे. मात्र भातावरचे गणपती ही प्रथा नागवेकर कुटुंबियांनी जपली आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी