शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पावसाअभावी भात लागवडीच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत. लागवड केलेली रोपे पिवळी पडली आहेत. कडाक्याचा उन्हामुळे भाताची रोपे वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. भातपेरणीच्या कामासह नांगरणी व अन्य मशागतीची कामेही पूर्ण करून घेतली. पावसामुळे रोपांची जोमदार वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या कामांना प्रारंभ केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला असला तरी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती, त्या मळेशेती, पाणथळ भागातील भात खाचरातून लागवडीची कामे उरकण्यात येत होती. मात्र, पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून कडकडीत उन्ह पडत आहे. दिवसभरात एखादी सर आली तर अन्यथा कडाक्याच्या उन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. लागवड केलेल्या क्षेत्रातील जमिनीला तडे गेले आहेत. रोपांचा रंग बदलला असून पिवळसर झाली आहेत. त्यामुळे रोपे जगण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांनी भाड्याने पंप घेऊन लागवड सुरू केली आहे. लागवड होत असली तरी पाऊस नसल्याने खर्च आणि परिश्रम वाया जात आहे. तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.