शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पावसाअभावी भात लागवडीच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत. लागवड केलेली रोपे पिवळी पडली आहेत. कडाक्याचा उन्हामुळे भाताची रोपे वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. भातपेरणीच्या कामासह नांगरणी व अन्य मशागतीची कामेही पूर्ण करून घेतली. पावसामुळे रोपांची जोमदार वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या कामांना प्रारंभ केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला असला तरी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती, त्या मळेशेती, पाणथळ भागातील भात खाचरातून लागवडीची कामे उरकण्यात येत होती. मात्र, पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून कडकडीत उन्ह पडत आहे. दिवसभरात एखादी सर आली तर अन्यथा कडाक्याच्या उन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. लागवड केलेल्या क्षेत्रातील जमिनीला तडे गेले आहेत. रोपांचा रंग बदलला असून पिवळसर झाली आहेत. त्यामुळे रोपे जगण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांनी भाड्याने पंप घेऊन लागवड सुरू केली आहे. लागवड होत असली तरी पाऊस नसल्याने खर्च आणि परिश्रम वाया जात आहे. तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.