शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरजीपीपीएल् बंद झाल्याचा फटका

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

आर्थिक कोंडी : ग्रामपंचायतींचे कोट्यवधी रूपये थकले; पंचायत समिती कारवाई इशारा

असगोली : गॅसच्या तुटवड्यामुळे गेले वर्षभर वीजनिर्मिती ठप्प असल्याने आरजीपीपीएल कंपनी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडली आहे. त्यामुळे त्या विद्युत प्रकल्पाकडून अंजनवेल, वेलदूर व रानवी या ग्रामपंचायतींना वार्षिक कर अदा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.या तीनही ग्रामपंचायतींना सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट सध्या कंपनी व्यवस्थापनापुढे आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुरुवातीला ५० टक्के रक्कम तरी द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे.सन २००२मध्ये कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने एन्रॉन दाभोळ वीज कंपनीचे रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनीत रुपांतर करुन सन २००५मध्ये एनटीपीसी व गेल या कंपन्यांनी वीजनिर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी बंद पडल्यानंतर ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळणे अशक्य वाटत होते. मात्र, ग्रामपंचायतीना सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आरजीपीपीएलने थकीत कर देण्यास सुरुवात केली. दरम्यान, आतापर्यंत कंपनी सुरळीतपणे ग्रामपंचायतींना कर देत आली आहे. परंतु वर्षभरापासून कंपनी आर्थिक कोंडीत सापडल्याने हा कर देण्यास कंपनी व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आर्थिक कोंडी झाल्यामुळे कंपनीपुढे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या.अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन ग्रामपंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी कंपनीत जाऊन चालू वर्षातील कर मिळावा, अशी मागणी केली होती. यावेळी २५ टक्के रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. मात्र, दीड महिना झाल्यानंतरही याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने पंचायत समितीने कंपनी व्यवस्थापनाला कराबाबत बैठक घेण्याची विनंती केली. या बैठकीला सभापती राजेश बेंडल, गटविकास अधिकारी आंब्रे आदी गेले होते. परंतु यावेळी कंपनीकडून टोलवाटोलव होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही चर्चा केल्याशिवाय येथून जाणार नाही, असा पवित्रा पंचायत समितीने घेतला. यानंतर आरजीपीपीएल प्रशासनाचे अधिकारी देशमुख, व्यवस्थापक देशपांडे, अप्पर महाव्यवस्थापक आर. एस. कौल यांच्याकडे कराबद्दलचा मुद्दा रेटून धरला. सभापतींनीदेखील आक्रमक होत कंपनीकडून दरवर्षी कर अदा होत असताना त्याची तरतूद करणे व्यवस्थापनाचे काम असते. २५ टक्के रक्कम देण्याचे कबूल करुनही आश्वासन पूर्ण केले नाहीत. पूर्ण रक्कम देता येत नसेल, तर अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार या रकमेपैकी ५० टक्के रक्कम कंपनीने अदा करावी, अशी मागणी केली. कर न भरल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा सभापती बेंडल यांनी दिला आहे. (वार्ताहर)तीनही ग्रामपंचायतींना आर्थिक वर्षातील कराची सुमारे १ कोटी १९ लाख ८२ हजार इतकी रक्कम अदा करण्याचे संकट.अंजनवेल ग्रामपंचायतीचे १ कोटी २० लाख, वेलदूरचे २१ लाख २७ हजार, तर रानवीची २० लाख ९२ हजार, यापैकी ५० टक्के रक्कम अदा करण्याची मागणी.