शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’ची लक्तरे वेशीवर!

By admin | Updated: September 22, 2015 23:54 IST

राजापूर तालुका : लाचखोर घटनांनी आली भोवळ

राजापूर : मागील काही दिवसात जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत पाचपैकी तीन प्रकरणे राजापुरातील आहेत. त्यामध्ये तहसीलदारांसह मंडल अधिकारी व तलाठी यांचा समावेश आहे. त्यामुळे महसूलच्या या भ्रष्ट कारभाराने राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.राजापूर तालुका महसूल विभागाचा एकूणच कारभार भ्रष्टाचाराने माखला असल्याचे या तीन कारवाईतून पुढे आले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी निगडीत असलेल्या महसूल प्रशासनाची ओळख गतिमान शासन अशी वारंवार केली जाते. मात्र, गैरव्यवहार व भ्रष्टाचार यातच राजापूरचे प्रशासन माहीर बनले आहे.तालुक्यात जमीन खरेदी - विक्री व्यवहारात गोरगरीब शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक झाली असून, नाहक त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. कागदपत्रातील केलेल्या चुका जनतेला भोगाव्या लागत आहेत. विविध प्रकारची उत्खनने, त्यासंदर्भात असलेल्या रॉयल्टी याबाबतचे व्यवहार संशयास्पद राहिले असून, अशा प्रकरणात दंडाची होणारी आकारणी यातसुद्धा पारदर्शकता नसल्याचेच अनेकवेळा पुढे आले आहे. याबाबत कुणीच जबाबदारीने काम करायला तयार नाही की, जाणूनबुजून चुका केल्या जातात. मात्र, अशा अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला देखील टाळाटाळच करण्यात आली असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.या सर्व कामादरम्यान काही एजंट मात्र सातत्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घुटमळत असतात. त्यांच्याकडून जमीन व्यवहारांची प्रकरणे दाखल करून केसीसबाबत सातत्याने हस्तक्षेप चालतो, असे आरोप सातत्याने होत आहेत. दुसरीकडे विविध प्रकारचे दाखले जनतेला वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. कुठल्याही दाखल्यावर सह्या करण्यासाठी पैसे घेतले जातात. पैसे मिळाल्याशिवाय कोणत्याही दाखल्यावर सही होत नाही, असे विदारक चित्र आहे. परिणामी जनतेला वेळेवर दाखले मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अर्जुनासह अन्य प्रकल्प असोत किंवा आंबा नुकसान भरपाई असो, जनतेला या कार्यालयाकडून उचित न्याय मिळालेला नाही, हेच विदारक वास्तव पुढे आले आहे. इथेदेखील एजंटाशिवाय सरकारी कागद पुढे सरकत नसल्याचे अनेकवेळा सिद्ध होऊनही जनतेची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले नाहीत. केवळ प्रशासन नाही तर लोकप्रतिनिधींनीदेखील जनहितासाठी या समस्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे लूट होत आहे.मागील काही महिन्यात तहसीलदारांसह प्रत्येकी एक मंडल अधिकारी व तलाठी लाच घेताना सापडले. राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांना दोन लाखांची लाच घेताना झालेली अटक यामुळे संपूर्ण तालुका चांगलाच हादरला आहे. मागील काही महिन्यात महसूलचे तीन अधिकारी सापडल्याने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. (प्रतिनिधी)प्रांत कार्यालयातही तेच?केवळ राजापूर तहसील कार्यालय नाही तर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या प्रांत कार्यालयाची स्थिती याहून वेगळी नाही. यापूर्वी रत्नागिरीतील प्रांत कार्यालयाकडून राजापूर तालुक्याचा व्यवहार चालायचा, त्यावेळी वेळेवर दाखले मिळत होते, पण राजापुरात हे कार्यालय सुरु झाल्यानंतर वेळेत दाखले मिळत नाहीत, हा येथील जनतेचा अनुभव बोलका आहे.