शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘महसूल’ची लक्तरे वेशीवर!

By admin | Updated: September 22, 2015 23:54 IST

राजापूर तालुका : लाचखोर घटनांनी आली भोवळ

राजापूर : मागील काही दिवसात जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत पाचपैकी तीन प्रकरणे राजापुरातील आहेत. त्यामध्ये तहसीलदारांसह मंडल अधिकारी व तलाठी यांचा समावेश आहे. त्यामुळे महसूलच्या या भ्रष्ट कारभाराने राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.राजापूर तालुका महसूल विभागाचा एकूणच कारभार भ्रष्टाचाराने माखला असल्याचे या तीन कारवाईतून पुढे आले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी निगडीत असलेल्या महसूल प्रशासनाची ओळख गतिमान शासन अशी वारंवार केली जाते. मात्र, गैरव्यवहार व भ्रष्टाचार यातच राजापूरचे प्रशासन माहीर बनले आहे.तालुक्यात जमीन खरेदी - विक्री व्यवहारात गोरगरीब शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक झाली असून, नाहक त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. कागदपत्रातील केलेल्या चुका जनतेला भोगाव्या लागत आहेत. विविध प्रकारची उत्खनने, त्यासंदर्भात असलेल्या रॉयल्टी याबाबतचे व्यवहार संशयास्पद राहिले असून, अशा प्रकरणात दंडाची होणारी आकारणी यातसुद्धा पारदर्शकता नसल्याचेच अनेकवेळा पुढे आले आहे. याबाबत कुणीच जबाबदारीने काम करायला तयार नाही की, जाणूनबुजून चुका केल्या जातात. मात्र, अशा अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला देखील टाळाटाळच करण्यात आली असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.या सर्व कामादरम्यान काही एजंट मात्र सातत्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घुटमळत असतात. त्यांच्याकडून जमीन व्यवहारांची प्रकरणे दाखल करून केसीसबाबत सातत्याने हस्तक्षेप चालतो, असे आरोप सातत्याने होत आहेत. दुसरीकडे विविध प्रकारचे दाखले जनतेला वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. कुठल्याही दाखल्यावर सह्या करण्यासाठी पैसे घेतले जातात. पैसे मिळाल्याशिवाय कोणत्याही दाखल्यावर सही होत नाही, असे विदारक चित्र आहे. परिणामी जनतेला वेळेवर दाखले मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अर्जुनासह अन्य प्रकल्प असोत किंवा आंबा नुकसान भरपाई असो, जनतेला या कार्यालयाकडून उचित न्याय मिळालेला नाही, हेच विदारक वास्तव पुढे आले आहे. इथेदेखील एजंटाशिवाय सरकारी कागद पुढे सरकत नसल्याचे अनेकवेळा सिद्ध होऊनही जनतेची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले नाहीत. केवळ प्रशासन नाही तर लोकप्रतिनिधींनीदेखील जनहितासाठी या समस्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे लूट होत आहे.मागील काही महिन्यात तहसीलदारांसह प्रत्येकी एक मंडल अधिकारी व तलाठी लाच घेताना सापडले. राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांना दोन लाखांची लाच घेताना झालेली अटक यामुळे संपूर्ण तालुका चांगलाच हादरला आहे. मागील काही महिन्यात महसूलचे तीन अधिकारी सापडल्याने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूरच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. (प्रतिनिधी)प्रांत कार्यालयातही तेच?केवळ राजापूर तहसील कार्यालय नाही तर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या प्रांत कार्यालयाची स्थिती याहून वेगळी नाही. यापूर्वी रत्नागिरीतील प्रांत कार्यालयाकडून राजापूर तालुक्याचा व्यवहार चालायचा, त्यावेळी वेळेवर दाखले मिळत होते, पण राजापुरात हे कार्यालय सुरु झाल्यानंतर वेळेत दाखले मिळत नाहीत, हा येथील जनतेचा अनुभव बोलका आहे.