शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शिमगाेत्सवावरील निर्बंध शिथिल करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST

राजापूर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. लाेकमत न्यूज ...

राजापूर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिमगोत्सव साजरा करण्याबाबत घालण्यात आलेले जाचक निर्बंध शिथिल करून शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे प्रांताधिकारी राजापूर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर व तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिले आहे.

शिमगोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक गावात वाडीवस्तीवर हा सण साजरा होत असतो. होळी, पालखी सोहळा, खेळे, रगपंचमी, गोमू, निशाण खेळे अशा विविध अविष्कारांत हा उत्सव कोकणी माणूस साजरा करत असतो. गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राजापूर तालुक्यात ग्रामदक्षता कमिटी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून त्याचा यशस्वी सामना केलेला आहे. त्यामुळे त्याचा तालुक्यात फार मोठा प्रादुर्भाव झालेला नाही. ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यामुळे आगामी शिमगोत्सवातही त्यात्या गावांवर जबाबदारी सोपविल्यास गर्दीचे नियोजन करून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, याची खबरदारी घेतली जाईल. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच शासनाने हा उत्सव साजरा करत असताना सरसकट काही नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये ज्या गावात हा उत्सव साजरा होणार आहे, त्या गावातील २५ लोकांनी कोरोना चाचणी करावी. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच उत्सव साजरा करावा. पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये. खेळे नाचू नयेत, असे काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, आठवडाबाजार, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणची गर्दी हे सारे सुरू आहे. मग, शिमगाेत्सवावरच बंधन का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, नगरसेवक गोविंद चव्हाण, अरविंद लांजेकर, शीतल पटेल, सोनम केळकर, प्रशांत जाधव, प्रमोद मांडवकर उपस्थित होते.