शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

सत्यशोधक हरी गोविंद पवार आणि फटीआक्का यांच्या समाधींचा जीर्णोध्दार

By मेहरून नाकाडे | Updated: December 10, 2023 19:30 IST

महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि आयदानकार उर्मिला पवार यांचे आजोबा हरी गोविंंद पवार आणि त्यांची बहीण फटीआक्का यांच्या समाधींचा जीर्णोध्दार फणसवळे येथे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.

महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते. रिटायर्ड होऊन गावी आले. त्या काळात अस्पृश्यांची लग्ने, धर्मीक विधी विटाळ होईल म्हणून भटजी झाडावर चढून करत असत. हरी पवार यांनी याला विराध करत आमचे विधी आम्ही करू असे भटजीना ठणकावले. त्यावेळी भटजींनी संस्कृत आणि प्राणायाम येतो का विचारले व याचा खरेपणा बघायला अट घातली व वरून बंद केलेल्या खड्ड्यात सात दिवस बसण्याची पैज लावली. हरी पवार यांनी ती पैज जिंकली. मसणातून परत आला म्हणून लोक त्यांना मसणगिरी बुवा म्हणू लागले.हरी पवारनी सत्यशोधकी धार्मिक विधी करण्यासाठी आपल्या आणि अनेक गावातल्या तरूणांना उभे केले. त्यांची बहीण फटीआक्का असे तिला म्हणत. तिलाही पंचांग बघायला लग्नविधी करायला शिकवले. तीही पंचांग बघून मुहूर्त सांगत असे. पूजा, लग्ने लावत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे गावात या दोघांच्या १९ व्या शतकात बांधलेल्या समाधी आहेत. या समाधींचा जीर्णोद्धार नवनिर्माण महाविद्यालयाचे संस्थापक अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे प्रा. सुकुमार शिंदे, लेखिका उर्मिला पवार, शाहू पवार, राजेंद्र कदम, अरूणा जगियासी, रवी पवार उपस्थित होते. या वेळी फणसवळे गावातील अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या मुलांना या सत्यशोधक भाऊ बहिणीच्या नावाने भेटवस्तू देण्यात आल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी