शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

सत्यशोधक हरी गोविंद पवार आणि फटीआक्का यांच्या समाधींचा जीर्णोध्दार

By मेहरून नाकाडे | Updated: December 10, 2023 19:30 IST

महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि आयदानकार उर्मिला पवार यांचे आजोबा हरी गोविंंद पवार आणि त्यांची बहीण फटीआक्का यांच्या समाधींचा जीर्णोध्दार फणसवळे येथे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.

महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते. रिटायर्ड होऊन गावी आले. त्या काळात अस्पृश्यांची लग्ने, धर्मीक विधी विटाळ होईल म्हणून भटजी झाडावर चढून करत असत. हरी पवार यांनी याला विराध करत आमचे विधी आम्ही करू असे भटजीना ठणकावले. त्यावेळी भटजींनी संस्कृत आणि प्राणायाम येतो का विचारले व याचा खरेपणा बघायला अट घातली व वरून बंद केलेल्या खड्ड्यात सात दिवस बसण्याची पैज लावली. हरी पवार यांनी ती पैज जिंकली. मसणातून परत आला म्हणून लोक त्यांना मसणगिरी बुवा म्हणू लागले.हरी पवारनी सत्यशोधकी धार्मिक विधी करण्यासाठी आपल्या आणि अनेक गावातल्या तरूणांना उभे केले. त्यांची बहीण फटीआक्का असे तिला म्हणत. तिलाही पंचांग बघायला लग्नविधी करायला शिकवले. तीही पंचांग बघून मुहूर्त सांगत असे. पूजा, लग्ने लावत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे गावात या दोघांच्या १९ व्या शतकात बांधलेल्या समाधी आहेत. या समाधींचा जीर्णोद्धार नवनिर्माण महाविद्यालयाचे संस्थापक अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे प्रा. सुकुमार शिंदे, लेखिका उर्मिला पवार, शाहू पवार, राजेंद्र कदम, अरूणा जगियासी, रवी पवार उपस्थित होते. या वेळी फणसवळे गावातील अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या मुलांना या सत्यशोधक भाऊ बहिणीच्या नावाने भेटवस्तू देण्यात आल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी