शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पावसाची विश्रांती, पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

राजापूर : गेले पाच दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला ...

राजापूर : गेले पाच दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने संततधार धरल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था कोलमडली होती. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या होत्या.

गुरुवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने व शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्याने वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरातील पूरस्थिती निवळली आहे. पाच दिवस पाण्याखाली असलेला शीळ चिखलगाव मार्गावरीलही पुराचे पाणी ओसरले आहे. आता सगळीकडेच पाणी ओसरल्याने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने नियोजन केले आहे.