शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

राजापुरात पावसाची विश्रांती, पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

राजापूर : गेले पाच दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला ...

राजापूर : गेले पाच दिवस तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला असून, जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने संततधार धरल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था कोलमडली होती. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या होत्या.

गुरुवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने व शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्याने वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरातील पूरस्थिती निवळली आहे. पाच दिवस पाण्याखाली असलेला शीळ चिखलगाव मार्गावरीलही पुराचे पाणी ओसरले आहे. आता सगळीकडेच पाणी ओसरल्याने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने नियोजन केले आहे.