शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विहिरी व धरणांच्या पाणीसाठ्याची पातळीही वाढली आहे. पावसामुळे चिपळूण तालुक्यातील कादवड येथे वाडा कोसळून वृद्धाचा मृत्यू व तीन मुले जखमी झाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३३.६७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी ३०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर आली असून आधीच निकृष्ट असलेल्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील कासारवाडी येथील सीताराम लक्ष्मण घाणेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कादवड येथे वाडा काेसळून बबन लक्ष्मण निकम (६५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर माधुरी गणेश निकम (१०), आरती संजय पवार (१५), मयूर लवेश जाधव (७) ही तीन बालके जखमी झाली आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील मौजे संगमेश्वर येथे विजेच्या धक्क्याने अनिल दत्तात्रय लाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील आतगाव येथील रंजना रमेश कदम यांच्या गोठ्याचे ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दाभोळ बेंडलवाडी येथील रचना चंद्रकांत राणे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. चिपळूण तालुका वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही जीवितहानी झालेली नाही.