शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विहिरी व धरणांच्या पाणीसाठ्याची पातळीही वाढली आहे. पावसामुळे चिपळूण तालुक्यातील कादवड येथे वाडा कोसळून वृद्धाचा मृत्यू व तीन मुले जखमी झाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३३.६७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी ३०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर आली असून आधीच निकृष्ट असलेल्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील कासारवाडी येथील सीताराम लक्ष्मण घाणेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कादवड येथे वाडा काेसळून बबन लक्ष्मण निकम (६५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर माधुरी गणेश निकम (१०), आरती संजय पवार (१५), मयूर लवेश जाधव (७) ही तीन बालके जखमी झाली आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील मौजे संगमेश्वर येथे विजेच्या धक्क्याने अनिल दत्तात्रय लाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील आतगाव येथील रंजना रमेश कदम यांच्या गोठ्याचे ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दाभोळ बेंडलवाडी येथील रचना चंद्रकांत राणे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. चिपळूण तालुका वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही जीवितहानी झालेली नाही.