शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गाडगीळ समितीचा अहवालच खाडीपट्ट्याला तारक

By admin | Updated: November 2, 2014 00:46 IST

अंमलबजावणीसाठी आग्रह : खाडीपट्टा भागात विविध ठिकाणी बैठक सत्र

खाडीपट्टा : तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या माधव गाडगीळ यांनी कोकण आणि पश्चिम घाट याबद्दल केलेल्या अभ्यासपूर्ण अहवालाची अंमलबजावणी झाली तरच खाडीपट्ट्यासह संपूर्ण कोकणाला भविष्य आहे, असे मत खाडीपट्ट्यातील समविचारी लोकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या अंमलबजावणीसाठी एकत्रित येण्याचे आवाहनही नुकतेच झालेल्या खाडीपट्ट्यातील बैठकीत करण्यात आले. खाडीपट्ट्यासह संपूर्ण कोकणातील नितांत सुंदर भुभाग वाचविण्यासाठी त्या अहवालातील शिफारशी हाच खाडीपट्ट्यासह कोकणी माणसाचा समृद्ध कोकणाचा आणि पश्चिम घाटाचा अंतिम आधार असून त्याची योग्य दखल घेऊन अंमलबजावणी केली तरच खाडीपट्ट्यासह कोकणाला भविष्य आहे. त्यासाठी या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी खाडीपट्ट्यातील निसर्ग आणि वन्यजीव क्षेत्रातील अनुभवी व पर्यावरणप्रेमी व कार्यकर्त्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील बहुतांश भाग हा पश्चिम घाटअंतर्गत येत असून अदूरदर्शी राजकीय निर्णयामुळे आतापर्यंत दिसणारा विकास व प्रगती ही पर्यावरणाची आणि कोकणच्या समृद्ध अशा निसर्गाची हानी दिसणारी आहे. त्याचे दुष्परिणाम खाडीकिनाऱ्यापासून ते मच्छिमार बांधवांपर्यंत सर्वांनाच दिसू लागले आहेत. विकासाच्या नावाखाली अनियंत्रित शहरीकरण दिसते आहे. अशावेळी गाडगीळ यांनी अत्यंत नि:स्वार्थीपणे मांडलेला अहवाल हाच येथील भूमिपुत्रांना तसेच समृद्ध अशा निसर्गाला वाचवू शकेल, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. हा अहवाल राजकीय हितसंबंधांना बाधा आणणारा असल्याचे राजकीय नेत्यांना पतपुरवठा करणारे धनाढ्य उद्योजक, कंपन्या आणि बेकायदेशीर व्यावसायिकांना चाप लावणार असल्याने राजकीय नेते तो कदापि मान्य करणार नाहीत हे सत्य जनतेने समजावे आणि गाडगीळ अहवालाच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, नागरिक व निसर्गप्रेमींनी एकत्रित येऊन शासनाकडे प्रयत्न करायला हवेत, असे के. के. तांबे यांनी सांगितले.खेड तालुक्यात ग्रामीण भागात खाडीपट्ट्यात होणारे वाळू उत्खनन व वृक्षतोड अशा प्रकारांमुळे तेथील पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. या सर्व गोष्टींवर आता पर्यावरण रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे मत तांबे यांनी व्यक्त केले आहे. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)