शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बोरज दुर्घटनेबाबत महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

खेड : तौक्ते चक्रीवादळामध्ये तुटलेली विद्युत वाहिनी अंगावर पडून झालेल्या बोरज येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी खेड तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत ...

खेड : तौक्ते चक्रीवादळामध्ये तुटलेली विद्युत वाहिनी अंगावर पडून झालेल्या बोरज येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी खेड तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले. गार्डिंग वायर नसल्याने ही दुर्घटना घडली आणि त्याला महावितरणचे अधिकारीच जबाबदार आहेत, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करावा आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सूचना बैठकीला उपस्थित असलेल्या पोलीस उपअधीक्षक शशिकांत काशीद यांना केली.

तौक्ते चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव बुधवारी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. कोरेगाव, शिव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी भेट दिली आणि लसीकरण मोहिमेबरोबरच तिथल्या समस्याही समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.

ही बैठक सकाळी ११ वाजता होती. आमदार जाधव नेहमीच कोणत्याही कार्यक्रम वा बैठकीला दिलेली वेळ पाळतात. ते स्वतः वेळेवर येतात, याची खात्री असल्यामुळे अनेक अधिकारी ते येण्यापूर्वी हजर असतात. मात्र ही बैठक वेळेत सुरू झाल्यानंतरही अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित नव्हते. बैठक सुरू झाल्यानंतर एक-एक अधिकारी आरामशीर येत होते. काही अधिकारी अचानक रजेवर गेले होते. हे पाहून आमदार जाधव यांचा पारा चढला. त्यांनी एकेका अधिकाऱ्याची हजेरी घ्यायला सुरुवात केली. काही अधिकाऱ्यांनी नुकसानाची माहितीही आणली नव्हती. ज्यांनी आणली होती, त्यात अनेक चुका होत्या. त्यामुळे ते अधिकच संतापले आणि हा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली.

चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा, काजू या झाडांवरील फळ गळती झाली आहे. या भागात उन्हाळी भात पीक घेतले जाते. ते कापणीला आले होते. वादळ व पावसामुळे ते पूर्णपणे हातचे गेले आहे. चक्रीवादळामुळे अनेक झाडे पिळवटतात आणि वाकतात. ही झाडे जिवंत दिसतात, परंतु दोन-तीन महिन्यांतच ती मरतात. अशा झाडांचाही पंचनामा करावा.

गुरे दगावल्यास ३५ हजारांपर्यंतची भरपाई शासनाकडून मिळते. या नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

सन २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्यात एकही नळपाणी योजना मंजूर झालेली नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्ह्यात गुहागर मतदारसंघात वेळणेश्वर (ता. गुहागर) व दयाळ (ता. खेड) येथे पाणीयोजना मंजूर झाल्या. त्यातील वेळणेश्वरची योजना पूर्ण झाली. परंतु, दयाळच्या योजनेच्या कामाचे आदेशच अजून काढण्यात आलेले नाहीत, हे समोर आल्यावर गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावांकडे दुर्लक्ष कराल तर गाठ माझ्याशी आहे, असाही इशारा त्यांनी दिला.

बैठकीला प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश आंब्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, संजय गोलटकर, विजय राक्षे, आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.