शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

महासैन्यभरतीपासून रत्नागिरीकर दूर

By admin | Updated: February 10, 2015 23:50 IST

मेळाव्याकडे पाठ : परजिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा प्रतिसाद ठंडा ठंडा..

रत्नागिरी : रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या महासैन्यभरती मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी झालेल्या मेळाव्याला एकदम थंडा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीतील अनेक होतकरू तरूणांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री २.३० वाजल्यापासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र, त्यावेळीही तरूणांमध्ये भरतीबाबत जोश नसल्याचे दिसून आले. याउलट पहिले दोन दिवस झालेल्या भरतीला त्या-त्या जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तरूण मिळेल त्या जागी आपले बस्तान मांडून, मिळेल त्या जागेत झोपून या भरती प्रक्रियेत सामील झाले होते.रत्नागिरीतील काही तरूणांना निकष माहित नसल्याने महामेळाव्याच्याठिकाणी आल्यावर माघारी परतावे लागले. उर्वरित जिल्ह्यांमधून या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. समस्या येऊ नये, यासाठी काही तरूण दोन दिवस अगोदरच रत्नागिरीत येऊन राहिले आहेत.रत्नागिरीसारख्या ठिकाणी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती होत आहे. तब्बल आठ दिवस होणाऱ्या या सैन्यभरतीकडे रत्नागिरीकरांनीच पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सैन्यदलातील नोकरीबाबत जिल्ह्यात जागृतीच नसल्याचे यामुळे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)अटींनी संधी हुकवलीरत्नागिरीतील रोहित कारकर (२५) हा रेल्वे स्थानकानजीक राहणारा एक तरूण. घरची गरिबी. वडील सुरक्षारक्षक. खासगी नोकरी करणारा हा तरूण केवळ अटीत न बसल्याने आवड असतानाही सैन्यभरतीपासून लांब राहिला. दिवसभर रेंगाळत राहत त्याने या भरतीतून अखेर काढता पाय घेतला. वय, उंची दोहोंमध्येही तो बसत नसल्याने त्याने केलेली मेहनत वाया गेली. मनापासून सैन्यात जायचं होतं, अटींनी संधी हुकवल्याची खंत ‘लोकमत’शी बोलताना त्याने व्यक्त केली.सिंधुदुर्गचाही अल्प प्रतिसादरत्नागिरीबरोबरच सिंधुदूर्ग जिल्ह्याचाही या सैन्यभरतीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरातून तब्बल ६ हजारच्या आसपास उमेदवार आले असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केवळ १३०० उमेदवारच या सैन्यभरती मेळाव्याला उपस्थित होते. कोकणातून सैन्यभरतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती.लोंढे वाढलेरत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांनी या भरतीकडे पाठ फिरवली असली, तरी अन्य जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी सैन्यात भरती होण्यासाठी जागृती करण्याची वेळ येत होती. मात्र, आता सैन्यभरतीमध्ये स्वत:हून तरूण सामील होत असल्याचे या भरती मेळाव्यामुळे दिसून येत आहे.जागा मिळेल तेथे विश्रांतीसैन्यभरती मेळाव्यासाठी आलेले तरूण जागा मिळेल तेथे विश्रांती घेताना आणि जेवण करताना दिसून येत होते. काहींनी पडक्या इमारती तसेच रिकाम्या गाळ्यांचाही आश्रय घेतला होता. मध्यरात्रीही नगरसेवक हजर...!रत्नागिरी : सैनिक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सत्यप्रतींच्या सहीशिक्क्यांसाठी वणवण करावी लागू नये, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राहुल पंडित रात्री १०.३० वाजल्यापासून पहाटे ३.३० पर्यंत शिवाजी स्टेडियमजवळ ठाण मांडून बसले होते.नगरसेवक सलील डाफळे आणि उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनीही त्यांना साथ देत असंख्य मुलांची वणवण संपवली. रात्री १0 वाजण्याच्या सुमारास काही मुले आपल्या दाखल्यांच्या सत्यप्रतींसाठी राहुल पंडित यांच्या घरी गेली. सैनिक भरतीसाठी येत असलेल्या मुलांना सह्यांची गरज लागेल आणि रात्रीच्यावेळी त्याच्यावर वणवण फिरण्याची वेळ येईल, हे लक्षात घेऊन पंडित यांनी लगेचच स्टेडियमजवळ जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते रात्री १०.३० वाजता स्टेडियमजवळ जाऊन टेबल टाकून बसले.थोड्याचवेळात नगरसेवक डाफळेही सह्या करण्यासाठी तेथे आले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास उपनगराध्यक्ष संजय साळवी हेही तेथे आले. तिघेही साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारांना सह्या करून देत होते. कोठीही वणवण न करता सह्या मिळाल्याबद्दल उमेदवारांनी त्यांचे आभार मानले. नगरसेवकांनी स्वत:हून केलेल्या या कामामुळे उमेदवारांची सोय झाली. याचपध्दतीने मंगळवारी रात्री कोल्हापूरमधून येणाऱ्या उमेदवारांच्या सोईसाठी हे नगरसेवक तेथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)नोकरीसाठी आलेल्या मुलांना कागदपत्रे ‘सत्यप्रत’ करण्यासाठी रात्रीच्यावेळी भटकत राहवे लागू नये किंवा तेवढ्या कारणासाठी त्यांचा अर्ज बाद होऊ नये, यासाठीच आपण सह्या करण्यासाठी तेथे टेबल टाकले होते. कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही, तर देशसेवा करू इच्छिणाऱ्या मुलांच्या सेवेसाठी आम्ही तेथे थांबलो होतो.- राहुल पंडित, नगरसेवक, रत्नागिरी