शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:20 IST

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

रत्नागिरी : कोविड-१९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.हा सन्मान माझ्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हावासीयांचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख ४२ हजार ०६१ जणांनी लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य पथकांद्वारे विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मात्र नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोकणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामानात मोठे बदल होत आहे. थंडी, ऊन आणि पाऊस असे वातावरण असल्याने नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी