शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:20 IST

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

रत्नागिरी : कोविड-१९ या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.हा सन्मान माझ्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हावासीयांचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख ४२ हजार ०६१ जणांनी लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर दस्तक’ अभियानाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य पथकांद्वारे विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मात्र नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोकणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामानात मोठे बदल होत आहे. थंडी, ऊन आणि पाऊस असे वातावरण असल्याने नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी