शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात अवशेष सापडले

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

भाग्यरेषेवर संकट : १९६२ नंतर प्रथमच इतकी भयावह अवस्थो

सुभाष कदम : चिपळूण , महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख असणाऱ्या कोयना धरणामध्ये सध्या १२.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे धरण बांधणीच्या काळात पाण्याखाली गेलेल्या गावातील घरांचे, मंदिरांचे अवशेष तसेच पाषाणाच्या मूर्तींचे आता दर्शन होऊ लागले आहे. यावर्षी पावसाने गुंगारा दिल्यामुळे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपायला आला तरी पुरेसा पाऊस पडत नाही. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. अशातच कोयना धरणाची पातळी कमालीची घटली आहे. पुरेसा पाऊस झाला तर कोयना धरणाच्या जलाशयात १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे धरण पुरेसे भरले तर वीजनिर्मिती व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते. परंतु, यावर्षी पाऊस लांबल्याने धरणात केवळ १२.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातच पायथ्याजवळ जलविद्युत प्रकल्पासाठी ३.३० टीएमसी पाणी राखीव करण्यात आले आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावर चालणारा कोयना हा राज्यातील एकमेव वीज प्रकल्प आहे. पाऊस पडला नाही तर राज्यात विजेचाही तुटवडा जाणवणार आहे. पावसामुळे समाधानकारक पीकही न आल्याने लोकांना जगणे अशक्य होणार आहे. सध्या हा टप्पा १ जूनपासून बंद करण्यात आला आहे. धरणात पाणी नसल्याने धरण बांधणीच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या गावातील घरे, मंदिरे, मोठमोठे दगड यांचे अवशेष दिसत आहेत. तेथील लोकांचे श्रध्दास्थान असलेली पाषाणाच्या मूर्ती, शंकराची पिंडी, नंदी व चौथरे स्पष्टपणे दिसत आहेत. भाविक याचे दर्शन घेत आहेत. पाऊस नियमित पडला नाही तर आणखी अडचण होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी तो किती दिवस राहील, याबाबत त्या भागातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.....महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात यंदा पाणीटंचाईने इतकी तीव्रता धारण केली की, धरण निर्मितीच्या काळात बुडालेली गावे, तेथील जुन्या अवशेषांसह मंदिरातील मूर्ती, घरांची कामे करताना वापरलेले साहित्य, घराची रचना या कोरड्या पात्रात स्पष्ट दिसत होती. या सर्व गोष्टींद्वारे गावकऱ्यांनी दुष्काळाचे चित्र समोर उभे केले असतानाच वरूणराजा बरसल्याने पाणीटंचाईचे संकट किमान टळल्यासारखे दिसले. यानिमित्ताने १९६२च्या धरणग्रस्तांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुरातन मंदिरातील मूर्ती आणि शिवपिंडीचे दर्शन झाले. त्या पिंडीचे दर्शन घेऊन या भागातील गावकऱ्यांनी पावसासाठी प्रार्थना केली.