शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राजापूरमध्ये वैयक्तिक गाठीभेटीवर भर

By admin | Updated: October 10, 2014 23:04 IST

रंगत वाढली : सर्वच पक्षांकडून छुप्या प्रचारावरच जोर, बड्या नेत्यांकडून दुर्लक्ष

विनोद पवार - राजापूर -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून, सर्वच उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतलेले दिसून येत आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याऐवजी वैयक्तिक गाठीभेटीवर भर देण्यात आला आहे. हीच रणनिती सर्व उमेदवारांनी अवलंबिली आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही छुप्या पध्दतीच्या प्रचाराचा अवलंब केला असून, राष्ट्रवादीने प्रचाराची राळ उठवली आहे. भाजपाचा प्रचार मात्र, संघ केंद्रित झाला असून, आपली ताकद कमी असल्याचे माहीत असतानाही नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे.राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे शिवसेनेचे बालेकिल्ला राहिला असून, काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी आपली प्रचारासाठीची ताकद लांजा तालुक्यावर केंद्रित केली आहे. या विधानसभा मतदारसंघातील विजयाची गणिते यावेळी लांजा तालुक्यावरच जास्त प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. काँग्रेसने स्थानिक उमेदवाराचा प्रश्न सोडवताना लांजा तालुक्यातील राजन देसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे अजित यशवंतरावही लांजा तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे अगोदरपासून नेतृत्व मिळवण्यासाठी धडपडणारे लांजावासीय आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावरच सर्व यशापयश अवलंबून राहणार आहे. पहिल्यापासूनच या संपूर्ण मतदारसंघावर सेनेचे वर्चस्व राहिल्यामुळे लांजा तालुक्यातील सेनेची मते किती प्रमाणात विभागली जातात, यावर राजन साळवी यांचेही गणित विसंबून राहणार असल्याचे मानले जाते. मात्र, ही शक्यता अगोदरच लक्षात घेऊन शिवसेनेने लांजा तालुक्याच्या पदरात जिल्हा परिषद अध्यक्षपद घालून आपली मते वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप यावेळी किती मते मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजपने इतरांपेक्षा वेगळी प्रचार पध्दत वापरुन आपले वेगळेपण सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कधीही प्रचारात न येणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्र्ता या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात आला आहे. अतिशय गुप्त पध्दतीने भाजपचा प्रचार सुरु आहे. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांनी ज्या ज्या घटकांंकडे दुर्लक्ष केले त्या बाबी हेरुन भाजपने आपला प्रचार सुरु ठेवला आहे. आजच्या घडीला भाजपची ताकद दिसून येत नसली तरी कोकण विकासासाठी भाजपच्या संजय यादवराव यांनी आजपर्यंत केलेले काम येथील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपबरोबरच संघांच्या कार्यकर्त्यांनी सर्व उमेदवारांच्या अगोदर केल्यामुळे प्रमुख काँग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या मताधिक्याबरोबरच विजयावर परिणाम करणारे ठरत असल्यामुळे दोन्ही गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.