शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरमध्ये वैयक्तिक गाठीभेटीवर भर

By admin | Updated: October 10, 2014 23:04 IST

रंगत वाढली : सर्वच पक्षांकडून छुप्या प्रचारावरच जोर, बड्या नेत्यांकडून दुर्लक्ष

विनोद पवार - राजापूर -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून, सर्वच उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतलेले दिसून येत आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याऐवजी वैयक्तिक गाठीभेटीवर भर देण्यात आला आहे. हीच रणनिती सर्व उमेदवारांनी अवलंबिली आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही छुप्या पध्दतीच्या प्रचाराचा अवलंब केला असून, राष्ट्रवादीने प्रचाराची राळ उठवली आहे. भाजपाचा प्रचार मात्र, संघ केंद्रित झाला असून, आपली ताकद कमी असल्याचे माहीत असतानाही नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे.राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे शिवसेनेचे बालेकिल्ला राहिला असून, काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी आपली प्रचारासाठीची ताकद लांजा तालुक्यावर केंद्रित केली आहे. या विधानसभा मतदारसंघातील विजयाची गणिते यावेळी लांजा तालुक्यावरच जास्त प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. काँग्रेसने स्थानिक उमेदवाराचा प्रश्न सोडवताना लांजा तालुक्यातील राजन देसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे अजित यशवंतरावही लांजा तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे अगोदरपासून नेतृत्व मिळवण्यासाठी धडपडणारे लांजावासीय आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावरच सर्व यशापयश अवलंबून राहणार आहे. पहिल्यापासूनच या संपूर्ण मतदारसंघावर सेनेचे वर्चस्व राहिल्यामुळे लांजा तालुक्यातील सेनेची मते किती प्रमाणात विभागली जातात, यावर राजन साळवी यांचेही गणित विसंबून राहणार असल्याचे मानले जाते. मात्र, ही शक्यता अगोदरच लक्षात घेऊन शिवसेनेने लांजा तालुक्याच्या पदरात जिल्हा परिषद अध्यक्षपद घालून आपली मते वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप यावेळी किती मते मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजपने इतरांपेक्षा वेगळी प्रचार पध्दत वापरुन आपले वेगळेपण सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कधीही प्रचारात न येणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्र्ता या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात आला आहे. अतिशय गुप्त पध्दतीने भाजपचा प्रचार सुरु आहे. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांनी ज्या ज्या घटकांंकडे दुर्लक्ष केले त्या बाबी हेरुन भाजपने आपला प्रचार सुरु ठेवला आहे. आजच्या घडीला भाजपची ताकद दिसून येत नसली तरी कोकण विकासासाठी भाजपच्या संजय यादवराव यांनी आजपर्यंत केलेले काम येथील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपबरोबरच संघांच्या कार्यकर्त्यांनी सर्व उमेदवारांच्या अगोदर केल्यामुळे प्रमुख काँग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या मताधिक्याबरोबरच विजयावर परिणाम करणारे ठरत असल्यामुळे दोन्ही गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.