शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:31 IST

तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सवप्रकल्प संघर्ष संघटनेच्या भूमिकेकडे लागले साऱ्यांचे लक्ष

राजापूर : तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेची स्थापना केली गेली होती. त्यानंतर अनेक आंदोलने छेडली गेली. सुरुवातीला पक्षविरहीत असलेली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने नंतर मात्र भाजपवगळता प्रत्येक राजकीय पक्षाकडे धाव घेतली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना भेटून नाणारविरोधी लढ्याला पाठबळ द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार काही पक्षांकडून प्रकल्प परिसरात नाणार विरोधात सभादेखील झाल्या होत्या. प्रकल्पविरोधाचा आधार घेऊन परिसरातील गावांत आपला जनाधार वाढवायचा, हा हेतू काही लपून राहिलेला नव्हता.

मात्र प्रकल्पग्रस्तांनी सर्वच सभांना लावलेल्या उपस्थितीमुळे नक्की हा जनाधार कुणाकडे आहे, त्याचा अंदाज आंदोलनातील सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना लागत नव्हता, तर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून पुढील राजकीय वाटचालीबाबत कुठलीच दिशा स्पष्ट करण्यात आली नव्हती. जो पक्ष प्रकल्प रद्द करील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, एवढेच वारंवार सांगितले जात होते.सेना-भाजपमधील युतीसाठी नाणार रद्द करावा लागला आणि प्रकल्पग्रस्त जनतेला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्यामुळेच नाणार गेल्याचे दावे-प्रतिदावे सुरु केले असून, या महिन्याच्या १६ व १७ मार्चला नाणारमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. १७ मार्चला संघर्ष संघटना आपल्या पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेकडून आता याबाबत कोणती भूमिका स्वीकारली जाते. त्याचा आपल्या पक्षाला कितपत फायदा होईल, यावर चर्चांना उधाण आले आहे. याबाबत मतमतांतरे सुरु झाली असून, आडाखेदेखील बांधले जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व करणारे संघटनेचे नेते अशोक वालम १७ मार्चला कोणती भूमिका घेतात, त्याकडे आता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी