शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

रिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:31 IST

तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सवप्रकल्प संघर्ष संघटनेच्या भूमिकेकडे लागले साऱ्यांचे लक्ष

राजापूर : तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेची स्थापना केली गेली होती. त्यानंतर अनेक आंदोलने छेडली गेली. सुरुवातीला पक्षविरहीत असलेली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने नंतर मात्र भाजपवगळता प्रत्येक राजकीय पक्षाकडे धाव घेतली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना भेटून नाणारविरोधी लढ्याला पाठबळ द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार काही पक्षांकडून प्रकल्प परिसरात नाणार विरोधात सभादेखील झाल्या होत्या. प्रकल्पविरोधाचा आधार घेऊन परिसरातील गावांत आपला जनाधार वाढवायचा, हा हेतू काही लपून राहिलेला नव्हता.

मात्र प्रकल्पग्रस्तांनी सर्वच सभांना लावलेल्या उपस्थितीमुळे नक्की हा जनाधार कुणाकडे आहे, त्याचा अंदाज आंदोलनातील सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना लागत नव्हता, तर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून पुढील राजकीय वाटचालीबाबत कुठलीच दिशा स्पष्ट करण्यात आली नव्हती. जो पक्ष प्रकल्प रद्द करील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, एवढेच वारंवार सांगितले जात होते.सेना-भाजपमधील युतीसाठी नाणार रद्द करावा लागला आणि प्रकल्पग्रस्त जनतेला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्यामुळेच नाणार गेल्याचे दावे-प्रतिदावे सुरु केले असून, या महिन्याच्या १६ व १७ मार्चला नाणारमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. १७ मार्चला संघर्ष संघटना आपल्या पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेकडून आता याबाबत कोणती भूमिका स्वीकारली जाते. त्याचा आपल्या पक्षाला कितपत फायदा होईल, यावर चर्चांना उधाण आले आहे. याबाबत मतमतांतरे सुरु झाली असून, आडाखेदेखील बांधले जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व करणारे संघटनेचे नेते अशोक वालम १७ मार्चला कोणती भूमिका घेतात, त्याकडे आता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी