शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

वीजनिर्मितीसाठीच्या पाण्यामध्ये कपात

By admin | Updated: April 22, 2016 01:04 IST

कोयना जलविद्युत प्रकल्प : पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा आटला...

सुभाष कदम -- चिपळूण --महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी झाली असली तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने घटला. राज्यात पडलेला दुष्काळ व तीव्र पाणीटंचाई यामुळे वीजनिर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या कोट्यापैकी १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आले आहे. त्याचा फटका राज्य सरकारला बसणार आहे.कोयना धरणात १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. दरवर्षी १ जून ते ३१ मे या कालावधीत पोफळी, कोयना चौथा टप्पा व अलोरे या तीन जलविद्युत प्रकल्पासाठी ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी दिले जाते. पाणीवाटप लवादानुसार हा कोटा वीजनिर्मितीसाठी दिला जातो, तर आॅक्टोबरनंतर पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी २२ टीएमसी किंवा गरजेनुसार जादा पाणी सोडण्याची तरतूद आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोयनेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातच दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीच्या पाणी कोट्यात १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आले. त्यामुळे पोफळी, चौथा टप्पा व अलोरे या वीजनिर्मिती केंद्रात सुमारे ६६ कोटी ५० लाख युनिट वीजनिर्मिती कमी होणार आहे. त्यामुळे ३ अब्ज ९८ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न पाण्यात जाणार आहे. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली. त्यामुळे पूर्वेकडील विभागासाठी कोयना धरणातून सिंचनासाठी सातत्याने पाणी सोडावे लागले. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणातून २७.२० टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले असून, धरण पायथा वीजगृहातून या पाण्यावर ११७.६२३ दशलक्ष युनिट इतकी वीज तयार करण्यात आली. कमी पावसामुळे वर्षभरात केवळ ७४.२८ टीएमसी पाणी धरणात जमा झाले. त्यातील सिंचनासाठी जादा पाणी देण्याची वेळ आली आहे. आजपर्यंतचा काळ सुखात गेला असला तरी आता धरणात केवळ ३२.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावरच आता ३१ मेपर्यंतचे तांत्रिक वर्ष व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत वीजनिर्मिती, शेती व पिण्याच्या पाण्यासह मृत पाणीसाठ्याबाबतही काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासन व प्रशासनानेही पश्चिमेकडील वीजनिर्मितीच्या पाणी कोट्याला कात्री लावली आहे. दरवर्षी ६७.५० टीएमसी पाणी कोट्याला आता १५ टीएमसीची कात्री लावल्याने वीजनिर्मितीसाठी ५२.५० टीएमसी पाणी वापराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ४२.५२ टीएमसी पाणी वापरून झाल्याने ३१ मेपर्यंत उर्वरित ९.७८ टीएमसी पाण्यावरच वीजनिर्मितीचे भवितव्य अवलंबून आहे. पोफळी, कोयना चौथा टप्पा व अलोरे या वीज प्रकल्पातून ४२.७२ टीएमसी पाण्यावर १८९२.६६९ दशलक्ष युनिट वीज तयार करण्यात आली. म्हणजेच चालू वर्षी १ टीएमसी पाण्यावर सरासरी ४ कोटी ४३ लाख २७ हजार ५४० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी याच काळात २८००.६०० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. चालू वर्षी वीजनिर्मितीसाठी पाणी कपात झाल्याने आतापर्यंत ९०७.९३१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. यावर्षी १५ टीएमसी पाणी कमी वापरले गेल्याने ६६ कोटी ४९ लाख १३ हजार १०० युनिट वीजनिर्मिती कमी होईल. त्यामुळे राज्याच्या महसूल उत्पन्नातही तूट येणार आहे. हा तोटा अंदाजे ३ अब्ज ९८ कोटी ९४ लाख ७८ हजार ६०० रुपये इतका होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात असणाऱ्या दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असताना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार असल्याने राज्य शासन तोट्यात आहे. पडणाऱ्या पावसावरच आणि निसर्गाचे मिळणारे सहकार्य यावरच हे आर्थिक गणित अवलंबून आहे. कोयना धरणाच्या पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.वीजनिर्मिती कमी होणार असल्याने ३ अब्ज ९८ कोटी रुपयांचा महसूल जाणार पाण्यात.दरवर्षी ६७.५० टीएमसी पाण्यावर होतेय वीजनिर्मिती.पश्चिमेकडे वीजनिर्मिती करुन पूर्वेकडे सिंचनासाठी सोडले जाते पाणी.दुष्काळाच्या झळा व पाणीटंचाई यामुळे वीजनिर्मितीसाठी १५ टीएमसी पाण्यात कपात. पोफळी वीजगृह, कोयना चौथा टप्पा व अलोरे वीजगृह येथे होतेय वीजनिर्मिती.निसर्गाच्या सहकार्यावरच अवलंबून आर्थिक गणित.तिजोरीवर भार : प्रतियुनिटचा सरासरी दरही कमी?कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती घटणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. महावितरण कंपनीचे धोरण व दराचा विचार करता घरगुती वापरासाठी प्रतियुनिट ३ रुपये ५० पैसे, तर व्यावसायिकांसाठी प्रतियुनिट ७ रुपये दर आकारण्यात येतो. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक वापरासाठी वीज उपलब्ध झाली असती तर त्यातून सरासरी ६ रुपये प्रतियुनिट उत्पन्न शासनाच्या पदरात पडले असते. परंतु, सद्यस्थितीत ही शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे.सिंचनासाठी अधिक पाणी सोडलेपोफळी जलविद्युत प्रकल्प, कोयना चौथा टप्पा व अलोरे या वीज प्रकल्पातून आतापर्यंत १८९२.६६७ दशलक्ष युनिट वीज तयार झाली आहे. परंतु, आता पाणी कपात होणार असल्याने यापुढील वीज निर्मिती घटणार आहे. सिंचनासाठी अधिक पाणी सोडल्यामुळे वीज निर्मितीसाठी पाणी कमी पडले आहे.