शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरच्या दरवाढीला क्रेडाईचा विरोध

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

या धोरणामुळे सर्वसामान्यांना घरे घेणे आवाक्याबाहेरचे ठरणार आहेत. २०२२ सालापर्यंत सर्वांना परवडणारी घरे या केंद्राच्या योजनेलाच यामुळे फटका बसणार

रत्नागिरी : रेडीरेकनर २०१६मध्ये जमीन व बांधकामाचे दर वाढल्यास सर्वसामान्यांसाठी घरे घेणे हे आवाक्याबाहेरचे होणार असून, याचा फटका सरकारच्या ‘सर्वांना परवडणारी घरे’ या धोरणाला बसू शकतो, अशी प्रतिक्रिया ‘क्रेडाई’ने व्यक्त केली आहे. गृहनिर्माण क्षेत्र हे आधीच आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत असताना केवळ महसुली उद्दिष्ट समोर ठेवून सरकारचा एएसआर वाढीचे धोरण राबविण्याचा विचार आहे. या धोरणामुळे सर्वसामान्यांना घरे घेणे आवाक्याबाहेरचे ठरणार आहेत. २०२२ सालापर्यंत सर्वांना परवडणारी घरे या केंद्राच्या योजनेलाच यामुळे फटका बसणार असल्याची प्रतिक्रिया ‘क्रेडाई’कडून व्यक्त होत आहे. बांधकाम क्षेत्रातील आजची अडचणीची परिस्थिती पाहता वाढीव एएसआर लावणे चुकीचे असल्याने विविध संघटनांनी निवेदनाद्वारे सरकारला याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.रेडीरेकनर ठरवण्याच्या प्रक्रियेबाबतही आक्षेप नोंदवण्यात आले होते. मात्र, याकडेही शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे ‘क्रेडाई’चे कार्याध्यक्ष महेंद्र जैन यांनी सांगितले.बांधकाम क्षेत्रातील वस्तुस्थितीचा अभ्यास करून यासंबंधी प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेऊन तसेच लोकप्रतिनिधींनी सरकारला दिलेली निवेदने या सर्वांचा विचार करून सरकारने एएसआर २०१६मध्ये वाढ करू नये, अशी मागणी ‘क्रेडाई’तर्फे करण्यात आली आहे. एएसआरच्या वाढीव प्रस्तावामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होतो, असे ‘क्रेडाई’तर्फे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)