शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर

By शोभना कांबळे | Updated: July 26, 2023 14:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह राजापूर तालुका दौऱ्यावर सकाळीच रवाना झाले आहेत.जिल्ह्यात बुधवारीही पावसाची संततधार कायम आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर करताच जिल्हाधिकाऱ्यांनी आज,  बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा - महाविद्यालये यांना सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तसेच लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. १९ आणि २० जुलै या दोन दिवसांत २५० मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला आहे. त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आहे.बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजापुरात दाखल झाले. संपूर्ण प्रशासन आपत्तींच्या अनुषंगाने लक्ष ठेऊन आहे. दरडग्रस्त तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन रहावे. तसेच सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काही आपत्ती आल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राजापुरात पुन्हा पूरस्थिती

अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता. त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरcollectorजिल्हाधिकारी