शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर

By शोभना कांबळे | Updated: July 26, 2023 14:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह राजापूर तालुका दौऱ्यावर सकाळीच रवाना झाले आहेत.जिल्ह्यात बुधवारीही पावसाची संततधार कायम आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर करताच जिल्हाधिकाऱ्यांनी आज,  बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा - महाविद्यालये यांना सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तसेच लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. १९ आणि २० जुलै या दोन दिवसांत २५० मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला आहे. त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आहे.बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजापुरात दाखल झाले. संपूर्ण प्रशासन आपत्तींच्या अनुषंगाने लक्ष ठेऊन आहे. दरडग्रस्त तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन रहावे. तसेच सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काही आपत्ती आल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राजापुरात पुन्हा पूरस्थिती

अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता. त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरcollectorजिल्हाधिकारी