शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्याही हाती झाडू

By admin | Updated: November 12, 2014 23:31 IST

स्वच्छता मोहीम : स्वच्छ भारत अभियानात प्रशासकीय अधिकारी सहभागी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रङ्कमोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणी प्रक्रियेने रत्नागिरीत वेग घेतला असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्त्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आवारातील दुर्लक्षित परिसर तसेच स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सफाई करुन या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:ला वाहून घेण्याचा संदेश दिला.रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि युद्धपातळीवर करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या अतिरिक्त वेळेत विशेष मोहीम राबवून आपापल्या कार्यालयांची स्वच्छता करीत आहेत. एवढेच नव्हे; तर वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभाग घेऊ लागल्याने या मोहीमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वच्छता ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे, असा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून विशेषङ्कमोहीम राबवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली. यावेळी मुख्य इमारत परिसरासह विविध कार्यालय इमारतींच्या मागील दुर्लक्षित भाग स्वच्छ करण्यात आला. आवारातील स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व आवश्यक तेथे स्वत: स्वच्छता केली. जिल्हा, तालुका, शहर आणि अगदी गावपातळीपर्यंत प्रत्येक कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येत असून, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या अभियानात जिद्द आणि उत्साहाने सहभागी झाले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे अभियान यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील या विशेष स्वच्छताङ्कमोहिमेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले, तहसीलदार मारुती कांबळे आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारीही सहभागीजिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही अनेक ठिकाणी केली स्वच्छता.उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, नियोजन अधिकारी यांच्यासह अनेक वर्ग-१च्या अधिकाऱ्यांचा समावेश.स्वच्छ भारत अभियान ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया : राधाकृष्णन बी.कार्यालयीन वेळेत कार्यालयेही होऊ लागली स्वच्छ.स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात वेग.जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मोहीम सुरू.