शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्याही हाती झाडू

By admin | Updated: November 12, 2014 23:31 IST

स्वच्छता मोहीम : स्वच्छ भारत अभियानात प्रशासकीय अधिकारी सहभागी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रङ्कमोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणी प्रक्रियेने रत्नागिरीत वेग घेतला असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्त्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आवारातील दुर्लक्षित परिसर तसेच स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सफाई करुन या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:ला वाहून घेण्याचा संदेश दिला.रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि युद्धपातळीवर करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या अतिरिक्त वेळेत विशेष मोहीम राबवून आपापल्या कार्यालयांची स्वच्छता करीत आहेत. एवढेच नव्हे; तर वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभाग घेऊ लागल्याने या मोहीमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वच्छता ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे, असा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून विशेषङ्कमोहीम राबवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली. यावेळी मुख्य इमारत परिसरासह विविध कार्यालय इमारतींच्या मागील दुर्लक्षित भाग स्वच्छ करण्यात आला. आवारातील स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व आवश्यक तेथे स्वत: स्वच्छता केली. जिल्हा, तालुका, शहर आणि अगदी गावपातळीपर्यंत प्रत्येक कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येत असून, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या अभियानात जिद्द आणि उत्साहाने सहभागी झाले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे अभियान यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील या विशेष स्वच्छताङ्कमोहिमेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले, तहसीलदार मारुती कांबळे आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारीही सहभागीजिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही अनेक ठिकाणी केली स्वच्छता.उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, नियोजन अधिकारी यांच्यासह अनेक वर्ग-१च्या अधिकाऱ्यांचा समावेश.स्वच्छ भारत अभियान ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया : राधाकृष्णन बी.कार्यालयीन वेळेत कार्यालयेही होऊ लागली स्वच्छ.स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात वेग.जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मोहीम सुरू.