शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:36 IST

रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाºयांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे- मिशन बंधारे - उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ बंधाºयांच्या पाण्यावर पिकविला जातो भाजीपालाबंधारे उभारण्यासाठी शासनाची दमडीही खर्च केली जात नाहीवनराई, विजय, कच्चे ओहोळ, नाल्यांमधील आटू लागले पाणीलोकसहभागातून उभारले जाताहेत बंधारे.

रत्नागिरी : जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ८४५० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे.जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याच्या मोहिमेचा दोन महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. 

बंधारे उभारण्यासाठी खासगी कंपन्यांनी जिल्हा परिषदेला साहित्याचा पुरवठा केला आहे. त्यामुळे शासनाचा एकही पैसा खर्च न करता खासगी कंपन्यांकडून देण्यात आलेल्या साहित्याचा वापर काही ठिकाणी बंधारे उभारण्यासाठी करण्यात येत आहे.दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३६६९ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्याला १०१० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना केवळ २४५ बंधारे पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याला १३०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना ४४१ बंधारे उभारण्यात आलेले आहेत. 

दापोली तालुक्याला १०६० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ७४२ बंधारे उभारले आहेत. अशा प्रकारे बंधाऱ्यांची कामे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावे, वाड्यांवर सुरु आहेत. या बंधाऱ्यांमध्ये वनराई बंधारे - ८००, विजय बंधारे - ११३६ व कच्चे बंधारे - १७३३ अशी वर्गवारी आहे.या बंधाऱ्यांच्या पाण्यावर दरवर्षी भाजीपाला निर्मिती करुन उत्पन्न घेण्यात येते. त्यामुळे बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकरी आर्थिक फायदा घेतात. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने त्यामुळे तेथे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते.

जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ओहोळ, नाले, नद्या नसल्याने त्या ग्रामपंचायती बंधारे कुठे उभारणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे पाणी आटण्याच्या स्थिती असल्याने बंधाऱ्यांची उद्दिष्टपूर्ती होणे अशक्य आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJalyukt Shivarजलयुक्त शिवार