शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : न डगमगता संकटावर जिद्दीने यशस्वी मात करा : सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:43 IST

संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.

ठळक मुद्देमानहानिकारक जगणे आणि संकटांमधून बोध घेऊनच मिळाली जगण्याची ताकद : सिंधुताई पाचलच्या सरस्वती विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी

राजापूर : काट्यासारखं मार्गात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना आपल्या भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे बोलताना केले. सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष अजित यशवंतराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन नारकर, माजी सरपंच अशोक सक्रे, बाबा सावंत, अण्णा पाथरे, अशोक गंगाराम सक्रे, पाचल संस्थेचे आजी - माजी पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व वर्गशिक्षक, कर्मचारी, अनेक मान्यवर, सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.आपल्या संघर्षमय जीवनात आलेल्या संकटांचा यशस्वी मुकाबला करताना एवढ्या पदापर्यंत कशी मजल मारता आली? त्याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. त्यामध्ये पतीने घराबाहेर कसे काढले, त्यानंतर सासरसह माहेरच्या मंडळींनी न दिलेला आसरा, उदरनिवार्हासाठी प्रसंगी रेल्वेत लहान मुलीसह मागावी लागलेली भीक, त्यावेळी आलेले मानहानिकारक प्रसंग, स्मशानात राहून जळत्या चितेवर भाजून खाव्या लागलेल्या भाकऱ्या इथपासून जीवन संपविण्याचे मनात आलेले विचार, त्यावेळी आलेले अनेक बरे-वाईट अनुभव असा आपला जीवनपटच त्यांनी उलगडला.या सर्व प्रसंगांना आपण धीराने सामोरे गेलो आणि ठरविले की, आता मागे हटायचे नाही. आजवर जीवनाला कंटाळून ते संपवायचे असा विचार कायम मनात असायचा. पण, त्या विचारांपासून परावृत्त करणाऱ्या थरारक घटनादेखील घडल्या आणि त्यातून योग्य तो बोध घेऊन जीवनाचे खरे महत्व कळाले. यापुढे कितीही संकटे येऊदे पण स्वत: मरायचे नाही तर मरणाऱ्यांसाठी जगायचे, असा निर्धार त्यांनी केला.विद्यार्थ्यांनीदेखील येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. त्यापासून अजिबात डगमगून जायचे नाही, असा निश्चय करा, असे आवाहन करताना तुमच्या जीवनाचे सोने कसे होईल, याकडे लक्ष द्या, त्यासाठी आपले काळीज धगधगते ठेवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना साद घातली. तसेच आई - वडिलांना विसरु नका, याची जाणीव करुन दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय