शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : न डगमगता संकटावर जिद्दीने यशस्वी मात करा : सिंधुताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:43 IST

संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.

ठळक मुद्देमानहानिकारक जगणे आणि संकटांमधून बोध घेऊनच मिळाली जगण्याची ताकद : सिंधुताई पाचलच्या सरस्वती विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी

राजापूर : काट्यासारखं मार्गात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना आपल्या भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे बोलताना केले. सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष अजित यशवंतराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन नारकर, माजी सरपंच अशोक सक्रे, बाबा सावंत, अण्णा पाथरे, अशोक गंगाराम सक्रे, पाचल संस्थेचे आजी - माजी पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व वर्गशिक्षक, कर्मचारी, अनेक मान्यवर, सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.आपल्या संघर्षमय जीवनात आलेल्या संकटांचा यशस्वी मुकाबला करताना एवढ्या पदापर्यंत कशी मजल मारता आली? त्याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. त्यामध्ये पतीने घराबाहेर कसे काढले, त्यानंतर सासरसह माहेरच्या मंडळींनी न दिलेला आसरा, उदरनिवार्हासाठी प्रसंगी रेल्वेत लहान मुलीसह मागावी लागलेली भीक, त्यावेळी आलेले मानहानिकारक प्रसंग, स्मशानात राहून जळत्या चितेवर भाजून खाव्या लागलेल्या भाकऱ्या इथपासून जीवन संपविण्याचे मनात आलेले विचार, त्यावेळी आलेले अनेक बरे-वाईट अनुभव असा आपला जीवनपटच त्यांनी उलगडला.या सर्व प्रसंगांना आपण धीराने सामोरे गेलो आणि ठरविले की, आता मागे हटायचे नाही. आजवर जीवनाला कंटाळून ते संपवायचे असा विचार कायम मनात असायचा. पण, त्या विचारांपासून परावृत्त करणाऱ्या थरारक घटनादेखील घडल्या आणि त्यातून योग्य तो बोध घेऊन जीवनाचे खरे महत्व कळाले. यापुढे कितीही संकटे येऊदे पण स्वत: मरायचे नाही तर मरणाऱ्यांसाठी जगायचे, असा निर्धार त्यांनी केला.विद्यार्थ्यांनीदेखील येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. त्यापासून अजिबात डगमगून जायचे नाही, असा निश्चय करा, असे आवाहन करताना तुमच्या जीवनाचे सोने कसे होईल, याकडे लक्ष द्या, त्यासाठी आपले काळीज धगधगते ठेवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना साद घातली. तसेच आई - वडिलांना विसरु नका, याची जाणीव करुन दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय