शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रत्नागिरी : मामाच्या लग्नातच उरकणार भाच्याची मुंज? - प्रचाराचा जोम वाढतोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:16 IST

येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही

ठळक मुद्दे-‘लोकसभे’तच ‘विधानसभे’ची रंगीत तालीम?

रत्नागिरी : येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही विधानसभेच्या छुप्या प्रचारासाठीची मोठी संधी ठरत आहे. भावी उमेदवार म्हणून मैदानात उतरू पाहणारे अनेकजण लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेचा प्रचार छुप्या रितीने करीत आहेत. लोकसभा प्रचार सभांमधूनही विधानसभेच्या उमेदवारीची इच्छा जाहीररित्या व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ‘मामाच्या लग्नात भाच्याची मुंज’, या म्हणीचा प्रत्यय जनतेला येत आहे. 

 

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या स्थितीत सर्वच राजकीय पक्षांमधील विधानसभा उमेदवारीला इच्छुक असलेल्यांनी उचल खाल्ली आहे. लोकसभेचा प्रचार करताना वरिष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या उमेदवारीचे पान लावून घेण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. तसेच काही इच्छुक प्रचार सभांच्या व्यासपीठावरून आपल्या उमेदवारील आशीर्वाद मागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगत आमच्याकडेही लक्ष ठेवा, असे सांगत आहेत.  

 

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होती. मात्र, नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. यावेळीही लोकसभेला युती झाली आहे. मात्र, येत्या दिवाळीच्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही युती टिकेल की नाही, याबाबत आतापासूनच शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे युती झाली तर काय व नाही झाली तर काय स्थिती असेल, यावरून विधानसभेच्या उमेदवारीची गणिते मांडली जात आहेत. जशी युतीमध्ये स्थिती आहे, तशीच कॉँग्रेस आघाडीमध्ये स्थिती आहे. त्यामुळे युती व कॉँग्रेस आघाडीमध्येही लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या उमेदवारीची व विजयाची शक्यता पडताळून घेतली जात आहे. 

 

विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास रत्नागिरी व गुहागर हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येणार आहेत. अन्य तीन मतदारसंघ  शिवसेनेच्या वाटणीला जाणार आहेत. चिपळूणमध्ये सेनेचे सदानंद चव्हाण, रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत, राजापूरमध्ये सेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत, तर गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व दापोलीत  राष्ट्रवादी चे संजय कदम हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हे आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

 

गुहागरमधून भाजपकडून विनय नातू यांच्या नावाची चर्चा आहे. चिपळूणमध्ये  राष्ट्रवादीतर्फे शेखर निकम यांनी उमेदवार म्हणून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार प्रसाद लाड यांचे नाव रत्नागिरीतून चर्चेत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ मानेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राजापूरमध्ये अजित यशवंतराव हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

 

प्रचाराची रणधुमाळी

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार शिवसेना, भाजप, रासप व रिपाइं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे या मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसचाही प्रचार सुरू झाला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रचार सभा अद्याप दिसून येत नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग