शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

रत्नागिरी : मामाच्या लग्नातच उरकणार भाच्याची मुंज? - प्रचाराचा जोम वाढतोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:16 IST

येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही

ठळक मुद्दे-‘लोकसभे’तच ‘विधानसभे’ची रंगीत तालीम?

रत्नागिरी : येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही विधानसभेच्या छुप्या प्रचारासाठीची मोठी संधी ठरत आहे. भावी उमेदवार म्हणून मैदानात उतरू पाहणारे अनेकजण लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेचा प्रचार छुप्या रितीने करीत आहेत. लोकसभा प्रचार सभांमधूनही विधानसभेच्या उमेदवारीची इच्छा जाहीररित्या व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ‘मामाच्या लग्नात भाच्याची मुंज’, या म्हणीचा प्रत्यय जनतेला येत आहे. 

 

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या स्थितीत सर्वच राजकीय पक्षांमधील विधानसभा उमेदवारीला इच्छुक असलेल्यांनी उचल खाल्ली आहे. लोकसभेचा प्रचार करताना वरिष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या उमेदवारीचे पान लावून घेण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. तसेच काही इच्छुक प्रचार सभांच्या व्यासपीठावरून आपल्या उमेदवारील आशीर्वाद मागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगत आमच्याकडेही लक्ष ठेवा, असे सांगत आहेत.  

 

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होती. मात्र, नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. यावेळीही लोकसभेला युती झाली आहे. मात्र, येत्या दिवाळीच्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही युती टिकेल की नाही, याबाबत आतापासूनच शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे युती झाली तर काय व नाही झाली तर काय स्थिती असेल, यावरून विधानसभेच्या उमेदवारीची गणिते मांडली जात आहेत. जशी युतीमध्ये स्थिती आहे, तशीच कॉँग्रेस आघाडीमध्ये स्थिती आहे. त्यामुळे युती व कॉँग्रेस आघाडीमध्येही लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या उमेदवारीची व विजयाची शक्यता पडताळून घेतली जात आहे. 

 

विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास रत्नागिरी व गुहागर हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येणार आहेत. अन्य तीन मतदारसंघ  शिवसेनेच्या वाटणीला जाणार आहेत. चिपळूणमध्ये सेनेचे सदानंद चव्हाण, रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत, राजापूरमध्ये सेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत, तर गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व दापोलीत  राष्ट्रवादी चे संजय कदम हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हे आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

 

गुहागरमधून भाजपकडून विनय नातू यांच्या नावाची चर्चा आहे. चिपळूणमध्ये  राष्ट्रवादीतर्फे शेखर निकम यांनी उमेदवार म्हणून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार प्रसाद लाड यांचे नाव रत्नागिरीतून चर्चेत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ मानेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राजापूरमध्ये अजित यशवंतराव हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

 

प्रचाराची रणधुमाळी

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार शिवसेना, भाजप, रासप व रिपाइं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे या मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसचाही प्रचार सुरू झाला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रचार सभा अद्याप दिसून येत नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग