शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

रत्नागिरीकरांना प्रांताधिकाऱ्यांची ३ महिने प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2016 00:44 IST

तीन महिन्यानंतरही अधिकारी नाही : जातीचे, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा करताना होतेय कसरत

रत्नागिरी : रत्नागिरीच्या प्रांताधिकारीपदी कार्यरत असलेले प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या बदलीला आता तीन महिने होत आले तरी अजूनही त्यांच्या पदावर नियुक्ती न झाल्याने रत्नागिरी व संगमेश्वरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक प्रवेशासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सहीनिशी आवश्यक असणारे जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा होताना कसरत करावी लागत आहे.रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात नाशिक येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड रत्नागिरीत आल्यानंतर त्यांच्याकडे मे महिन्यात या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याही प्रशिक्षणाची मुदत संपल्याने ते पुढील प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही जबाबदारी हजारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे चिपळूणचाही पदभार असल्याने ते रत्नागिरीत आल्यानंतर दाखल्यांवर सह्या होत आहेत.सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी मुलांची आणि पालकांची विविध दाखल्यांसाठी पळापळ सुरू आहेत. नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या सहीने मिळणारे दाखले चटकन मिळत आहेत. मात्र, जातीच्या तसेच नॉन क्रिमीलेअर, आदी दाखल्यांवर प्रांताधिकारी यांचीच सही आवश्यक असल्याने हे दाखले मिळण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्यातच चिपळूण प्रांताचा कार्यभार सांभाळतानाच रत्नागिरीचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. रत्नागिरी आणि चिपळूण ही दोन्हीही कार्यक्षेत्रे मोठी असल्याने प्रांताधिकारी हजारे यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिपळूण येथील महत्वाच्या सुनावणी, निर्णय मार्गी लावतानाच रत्नागिरीतील कामाचा आवाका सांभाळावा लागत आहे. त्यातच आता दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचीही धावपळ झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडील कामांचे महत्व लक्षात घेऊन हजारे यांना आठवड्यातील काही दिवस रत्नागिरीला द्यावे लागत आहेत. यामुळे कामांचा निपटारा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेले तीन महिने रत्नागिरीला नवीन प्रांताधिकारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. रत्नागिरीकर नव्या प्रांताधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ सुरू आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले जमा करावे लागत आहेत. प्रांत कार्यालयात या दाखल्यांसाठी गर्दी होत असून, प्रांताधिकारी नसल्याने या दाखल्यांचा निपटारा होत नाही.