शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरी :सात वर्षांनंतर कुटुंबियांशी भेट, विजापूरच्या राजूला माहेरमुळे मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:22 IST

निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे.

ठळक मुद्देसात वर्षांनंतर कुटुंबियांशी भेट, विजापूरच्या राजूला माहेरमुळे मिळाले घर साखरपुडा झाल्यानंतर तीन वर्षांनी झाला होता बेपत्ता

रत्नागिरी : निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे.

सांगली जिल्ह्यातील आष्ठा - बावची रोडवर अनेक वर्षे फिरणाऱ्या या मनोरूग्णाला स्थानिक तरूण वैभव मोरे, अमरदीप काटे व माहेर संस्था, मिरजचे कार्यकर्ते अभिजीत कांबळे यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल केले होते. तो तरूण संस्थेत दाखल झाल्यावर फक्त आपले नाव राजू चव्हाण असे सांगत होता.

पूर्ण पत्ता सांगण्यास तो सक्षम नव्हता. माहेर संस्थेत त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. येथील अधीक्षक सुनील कांबळे व अमित यांनी वारंवार त्याच्याशी चर्चा केली. विजापूर जवळ बरदगी नावचे आठ लमान तांडे असल्याचे कळले.

पुन्हा त्याच्याशी संवाद साधला, तेव्हा तो बरदगी तांडा नं. ३ येथील असल्याचे कळले. त्यानंतर विजापूर पोलीस ठाण्यातून ग्रामीण पोलीस ठाण्याचा नंबर मिळाला. तेथील पुजारी हवालदार यांनी दोन दिवसात राजूचे नातेवाईक शोधले.

दुसऱ्याच दिवशी राजूचे काका रूपसिंग चव्हाण व पुतण्या रत्नागिरीत हजर झाले. साखरपुढा होऊन तीन महिन्यांनी राजू बेपत्ता झाला होता. तो सात वर्षे बेपत्ता होता, असे या नातेवाईकांनी सांगितले.

गोरमाटी भाषा राजू हा लमाणी समाजाचा असून, तो गोरमाटी भाषा बोलतो आहे, हे लक्षात आल्यानंतर सुनील कांबळे यांची पत्नी विजया हिला गोरमाटी बोलता येत असल्याने तिने राजूशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याचे पूर्ण नाव राजू रामचंद्र चव्हाण, गाव बरदगी, विजापूर असे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी