शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:51 IST

लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप

ठळक मुद्देसामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप यावेळीही समसमान झाले आहे. रत्नागिरी विधानसभेची ही जागा गेल्या १५ वर्षात भाजपला मानवली नाही. तरीही भाजपच्या वाट्याची ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह धरला जात असल्याने यावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

२००४ च्या विधानसभा निवडणूकीआधी रत्नागिरीच्या जागेवर भाजप आमदार विजयी झाले होते. मात्र २००४ नंतर या मतदारसंघात भाजपला मात देत त्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसमध्ये असलेले आमदार उदय सामंत हे विजयी झाले. २००९  मध्येही राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून उदय सामंत विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला व सेनेतर्फे पुन्हा ते रत्नागिरी मतदारसंघातून विजयी झाले. पुन्हा एकदा यावेळी सेनेतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. मात्र गेल्यावेळी विधानसभेत युती नव्हती. यावेळी युती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ युतीधर्मानुसार भाजपचा असल्याने तो भाजपलाच मिळावा म्हणून भाजपामधील काही नेते आग्रही आहेत.

या मतदारसंघात भाजपातर्फे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीची आधीपासून चर्चा होती. युती न झाल्यास हे प्रसाद लाड व उदय सामंत निवडणूक रिंगणात आमने सामने येतील अशीही चर्चा होती. आता युती झाली आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या वाट्याला आलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळावा, असा आग्रह स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे धरला जात आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रीक करणाºया आमदार उदय सामंत यांचे सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  घनिष्ठ संबंध आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. स्थानिक पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्याशीही सामंत यांचे संबंध चांगले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरील हक्क सांगण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला तरी सामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

समिकरणे बदलणार!लोकसभेची निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार आहे. राज्य विधानसभेची निवडणूक २०१९ च्या अखेरीस होणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. मात्र काहीही झाले तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी राजकीय बस्तान चांगले बसविल्याने त्यांच्या उमेद्वारीला धोका नाही, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी