शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:51 IST

लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप

ठळक मुद्देसामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर्मानुसार विधानसभेचे जागावाटप यावेळीही समसमान झाले आहे. रत्नागिरी विधानसभेची ही जागा गेल्या १५ वर्षात भाजपला मानवली नाही. तरीही भाजपच्या वाट्याची ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह धरला जात असल्याने यावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

२००४ च्या विधानसभा निवडणूकीआधी रत्नागिरीच्या जागेवर भाजप आमदार विजयी झाले होते. मात्र २००४ नंतर या मतदारसंघात भाजपला मात देत त्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसमध्ये असलेले आमदार उदय सामंत हे विजयी झाले. २००९  मध्येही राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून उदय सामंत विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला व सेनेतर्फे पुन्हा ते रत्नागिरी मतदारसंघातून विजयी झाले. पुन्हा एकदा यावेळी सेनेतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. मात्र गेल्यावेळी विधानसभेत युती नव्हती. यावेळी युती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ युतीधर्मानुसार भाजपचा असल्याने तो भाजपलाच मिळावा म्हणून भाजपामधील काही नेते आग्रही आहेत.

या मतदारसंघात भाजपातर्फे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीची आधीपासून चर्चा होती. युती न झाल्यास हे प्रसाद लाड व उदय सामंत निवडणूक रिंगणात आमने सामने येतील अशीही चर्चा होती. आता युती झाली आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या वाट्याला आलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळावा, असा आग्रह स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे धरला जात आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रीक करणाºया आमदार उदय सामंत यांचे सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  घनिष्ठ संबंध आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. स्थानिक पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्याशीही सामंत यांचे संबंध चांगले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरील हक्क सांगण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला तरी सामंत यांचे वरिष्ठांशी असलेले राजकीय संबंध त्यांना उमेदवारीसाठी उपयुक्त ठरतील का, याचीही चर्चा आहे.

समिकरणे बदलणार!लोकसभेची निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार आहे. राज्य विधानसभेची निवडणूक २०१९ च्या अखेरीस होणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. मात्र काहीही झाले तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी राजकीय बस्तान चांगले बसविल्याने त्यांच्या उमेद्वारीला धोका नाही, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी