शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:36 IST

रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते.

ठळक मुद्देरत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभागमांडवी, भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनावेळी संस्था कार्यरत

रत्नागिरी : शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. अनंत चतुर्दशीला शहरातील मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो.यावर्षी भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते.

गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाऱ्यावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते. शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, स्काऊट गाईड, हरित सेना पथक, फिनोलेक्स महाविद्यालय, जिद्दी माऊंटेनिअर्स तसेच नगर पालिकेचे कर्मचारी मिळून २५० मंडळी स्वच्छता उपक्रमात सहभागी झाली होती. स्वच्छता मोहिमेसाठी यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिद्द माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष धीरज पाटकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.निर्माल्यापासून खतरत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावर एक टन, तर भाट्ये किनाऱ्यांवर ३०० किलो मिळून सव्वा टन निर्माल्य संकलित करण्यात आले. त्याचबरोबर गौरी गणपती विसर्जनावेळी मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले होते. भाट्ये येथील प्रादेशिक नारळ रोपवाटिका केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. त्यामुळे निर्माल्य तेथे देण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनRatnagiriरत्नागिरी